ऑनलाईन टीम / कोची :
लॉक डाऊनमुळे मालदीवमध्ये अडकून पडलेल्या 588 भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यात आले आहे. ‘वंदे भारत’ मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात ही प्रक्रिया पार पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाच्या ‘समुद्रसेतू’ या मोहिमेद्वारे ‘आयएनएस जलाश्व’ या नौकेतून 588 भारतीयांना कोचीच्या किनाऱ्यावर रविवारी आणण्यात आले आहे.
नौदल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘द कोची पोर्ट ट्रस्ट’ ने याबाबत ट्विट केले असून मायदेशी परतल्या भारतीयांचा फोटो देखील त्याला जोडला आहे. परतलेल्यांमध्ये 538 रहिवासी हे केरळमधील, 15 जण तामिनाडू, 3 जण तेलंगणा आणि 2 जण लक्षद्वीप मधील आहेत.
याआधी 10 मे ला मालदीवहून 698 भारतीयांना मायदेशी आणले होते. तर दोन दिवसांपूर्वी ‘आयएनएस मगर’ या नौकेतून 202 भारतीयांना परत आणले होते. असे ही नौदल अधिकाऱ्याने यावेळी सांगितले.
दरम्यान, भारतीय उच्चायोगाने मालदीव सरकारचे नागरिकांच्या सुरक्षित पाठवणी बद्दल आभार मानले असून, त्यांना धन्यवाद दिले आहेत. ,