प्रतिनिधी /बेळगाव
महागाई, निसर्गाचा लहरीपणा आणि त्यानंतर व्यापाऱयांकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी मोठय़ा अडचणीत येत आहे. उत्पादनापेक्षा अधिक खर्च, तरीदेखील वडिलोपार्जित शेती आहे म्हणून शेतकरी शेती करत आहेत. मात्र पिकविलेल्या उत्पादनामध्ये काटामारीचा प्रकार वाढला आहे. राजहंसगड येथे एका भात खरेदीदाराने शेतकऱयाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे त्या भात व्यापाऱयाला चांगलेच धारेवर धरण्यात आले.
राजहंसगड येथील एक शेतकरी भातविक्री करत होता. यात तो हे भात गर्लगुंजी येथील एका भात खरेदीदाराला देत होता. त्यावेळी एका पोत्यामध्ये तब्बल 12 किलोचा फरक आढळला. भात खरेदीदाराने आणलेल्या काटय़ामध्ये 12 किलोचा फरक होता. शेतकऱयाला वजन केल्यानंतर संशय आला. त्यानंतर एका डेअरीमधील वजनकाटा आणून वजन केले असता 12 किलो अधिक वजन असल्याचे दिसून आले.
या प्रकारानंतर साऱयांनाच धक्का बसला. अशाप्रकारे पिळवणूक होत असेल तर शेतकऱयांनी कसे जगायचे? असे म्हणत त्या व्यापाऱयाला चांगलेच धारेवर धरले. गावातील अनेक जण त्या ठिकाणी जमा झाले. त्यानंतर त्याला धारेवर धरून जाब विचारण्यात आला. या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. व्यापारी लोक शेतकऱयांची कशी फसवणूक करतात, हे आता उघडकीस येत आहे. अनेक ठिकाणी काटामारी केली जात आहे. भाताचे दर सध्या जेमतेम आहेत. त्यामुळे शेतकऱयांना परवडणे अवघड आहे. तरीदेखील परिस्थितीमुळे शेतकरी भातविक्री करत आहे. मात्र अशाप्रकारे फसवणूक होत असल्यामुळे संताप व्यक्त होत
आहे.
पावसामुळे शेतीपिकांना फटका बसत आहे. पूरपरिस्थितीमुळे अनेक शेतकऱयांनी दुबार पेरणी केली. त्याचबरोबर भात लागवडही केली. त्यासाठी अधिक खर्च करावा लागला. यातच ट्रक्टर, बैलजोडी यांच्या भाडय़ामध्ये वाढ झाली आहे. मजुरीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. असे असताना आता भात व्यापाऱयांकडून अशी फसवणूक होत आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापुढे शेतकऱयांनी जागरुक राहून अशा व्यापाऱयांना धडा शिकवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.