शेतकऱयांना कर्ज वितरणासह म्हशीही देणार : सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
प्रतिनिधी / बेळगाव
वडगाव येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी सोसायटीला 1 कोटी कर्ज वाटण्याचे उद्दिष्ट दिले आहे. पहिल्यांदाच इतकी मोठी रक्कम शेतकऱयांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून शेतकऱयांनी तातडीने सोसायटीमध्ये पत करून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोसायटीचे चेअरमन अमोल देसाई यांनी केले आहे.
संत ज्ञानेश्वर मंदिर (वाडा कंपाऊंड) येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये ही माहिती देण्यात आली. केवळ 3 टक्के व्याजाने 300 म्हशी देण्यात येणार आहेत. या सोसायटीची प्रगती करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, कर्ज घ्यावे व ते वेळेत फेडावे. त्यामुळे सोसायटीची आणि स्वतःचीही पत राहते. तेव्हा वडगाव, शहापूर, बेळगाव येथील शेतकऱयांनी याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी व्हा. चेअरमन आप्पाजी हलगेकर यांनीही विविध विषयांवर शेतकऱयांनी म्हणणे मांडावे, असे आवाहन केले. शेतकऱयांसाठी ही सोसायटी आहे. सरकार या सोसायटीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवत असते. त्या योजना शेतकऱयांनी घ्याव्यात आणि घेतलेले कर्ज वेळेत फेडावे. त्यामुळे सोसायटीचा विकास होऊ शकतो, असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांनीही विचार मांडले. या सभेला संचालिका वर्षा आजरेकर, गंगाधर बिर्जे, रघुनाथ जुवेकर, तानाजी भोसले, संतोष शिवणगेकर, गुरुराज शहापूरकर यांच्यासह इतर संचालक व भागधारक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत बाळेकुंद्री यांनी केले. सभेमध्ये मागील वर्षाच्या अहवालाचे वाचन सेपेटरी मल्लिकार्जुन हेब्बल्ली यांनी केले. प्रारंभी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, लक्ष्मण हलगेकर, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, माजी आमदार बी. आय. पाटील, पी. ओ. धामणेकर यांच्यासह इतर दिवंगत शेतकऱयांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
विद्यार्थ्यांचा सत्कार
शेतकऱयांची मुले ही अत्यंत कष्टाने शिक्षण घेत असतात. प्रतिकुल परिस्थितीत वडगाव येथील योगेश आप्पाजी राजगोळकर या बारावीच्या विद्यार्थ्याने विज्ञान विभागात 95 टक्के गुण मिळविले. त्याबद्दल सोसायटी व पारायण मंडळ ट्रस्ट आणि शेतकरी सुधारणा मंडळ-वडगाव यांच्यावतीने त्याला रोख 5 हजार देऊन गौरविण्यात आले. वडगावमधील विक्रम कंग्राळकर हा तरुण सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्याचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कृषी पत्तीन सोसायटी आणि शेतकरी सुधारणा युवक मंडळाच्यावतीने दरवषीच शेतकऱयांच्या मुलांचा अशाप्रकारे सत्कार केला जातो. याबद्दल या संघटनेचेही कौतुक होत आहे.