नागरिकांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
वडगाव येथील तेग्गीन गल्ली, चावडी गल्लीपासून बाजार गल्लीला जोडणाऱया पॅसेजमध्ये अतिक्रमण झाले असून तातडीने ते अतिक्रमण हटवावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बाजार गल्ली येथील मारुती मंदिराला लागूनच पॅसेज आहे. तो पॅसेज तेग्गीन गल्ली, चावडी गल्ली यांना जोडतो. वास्तविक तो पॅसेज सीडीपी मॅपप्रमाणे 20 फूट आहे. मात्र त्यामध्ये अतिक्रमण झाले आहे. आता पुन्हा नक्याने बांधकाम सुरू आहे. ते बांधकाम बेकायदेशीर असून तातडीने थांबवावे आणि पूर्वीप्रमाणे पॅसेज सोडावा, अशी मागणी होत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संजय विष्णू धोत्रे, जगदीश चुरमुरी, गजानन मोरकर, महांतेश बडगेर, बाहुबली कुडची, मंजू होसकेरी, बसवराज कामकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.