बचतगटांच्या सहाय्याने वनखात्याचा अभिनव प्रयोग
प्रतिनिधी / सावंतवाडी:
जंगलात मिळणाऱया फळांवर प्रक्रिया करणाऱया उद्योगांना सिंधुदुर्ग वनविभाग चालना देणार आहे. त्यासाठी महिला बचतगटांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. महिलांना प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि बाजारपेठ वनविभागातर्फे मिळवून दिली जाणार आहे. वनअमृत ब्रँडखाली ही उत्पादने विकण्यात येणार आहे. सोमवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे वनसंरक्षक बेन यांच्या उपस्थितीत येथे होणाऱया बैठकीत यावर चर्चा होणार आहे.
सुधीर मुनगंटीवार वनमंत्री असताना नागपूर येथे असा प्रयोग राबविण्यात आला होता. जगंलाशी निगडीत असलेल्या लोकांकडून जंगलातील वनस्पतीपासून बनवलेली उत्पादने आणि वस्तू वनविभागातर्फे वन धन शॉपमध्ये माफक दरात विकण्यास प्रारंभ झाला होता. टप्प्याटप्प्याने हा प्रयोग राज्यात राबविण्याचे ठरले होते. त्यानुसार हा प्रयोग सिंधुदुर्गात होत आहे. हा प्रयोग प्रथम छत्तीसगढ राज्याने राबविला होता. अशी उत्पादने रेल्वे आणि एअरपोर्टवर विकण्यात येत होती.
येथील जंगले समृद्ध आहेत. त्यात जांभूळ, करवंदे, पाके (आमसुलसारखा वापर), हिरडा, चारोळी आदी फळे मिळतात. त्याशिवाय फणस, आंबा, काजूचेही उत्पादन मोठय़ा प्रमाणत होते. या फळांवर प्रक्रिया करत त्या माध्यमातून महिलांना रोजगार संधी मिळाव्यात, यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी वनविभाग महिलांना फळांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामुग्री पुरविणार आहे. तसेच त्यांनी उत्पादीत केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देणार आहे. ही उत्पादने वनअमृत
ब्रँडखाली बाजारपेठेत आणली जाणार आहेत. महिला बचतगटांच्या सहाय्याने वनविभाग हा प्रयोग जिल्हय़त राबविणार आहे. 14 डिसेंबरला होणाऱया बैठकीत त्यावर चर्चा होऊन पुढील निर्णय होणार आहे.