सत्तरी भूमिपुत्र संघटनेचा आरोप : संघटनेला संपविण्याचे षड्यंत्र
प्रतिनिधी / वाळपई
सत्तरी तालुक्मयातील भूमिपुत्र संघटना भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी लढा देत आहे. या कार्यामध्ये वनखात्याची यंत्रणा खो घालण्याचा प्रयत्न करीत आहे. सावर्डे पंचायत क्षेत्रातील करंझोळ येथील हुळर्ण डोंगरावर आग लावल्या प्रकरणी करंझोळ भागातील दोन भूमिपुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनखात्याने हे षड्यंत्र रचले असून त्यांनीच ही आग लावल्याचा आरोप भूमिपुत्र संघटनेने वाळपईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
अशाप्रकारे षड्यंत्र रचून भूमिपुत्रांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देऊन भूमिपुत्र संघटनेने दिला. संघटनेचे कार्य रोखण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नसल्याचे संघटनेने सांगितले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गावस, समितीचे पदाधिकारी आंतानियो पिंटू, रामचंद्र नाईक, सहदेव गावडे, अर्जुन गावडे, बातू गावडे उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी हुळर्ण डोंगरावर आग लावून नैसर्गिक साधनसंपत्तीची हानी करण्यात आली होती. याप्रकरणी वनखात्याने करंझोळ भागातील दोन भूमिपुत्रांवर गुन्हा दाखल केला आहे. यावर संघटनेने आक्षेप घेतला आहे. सदर डोंगरावर करंझोळ गावातील पूर्वजांनी मोठय़ा प्रमाणात काजू बागायतीची लागवड केली. त्यामुळे याठिकाणी आग लावून काजू बागायत नष्ट करण्याचे कारस्थान भूमिपुत्र करू शकत नाहीत. वनखात्याच्या कर्मचाऱयांनीच या डोंगराला आग लावून त्याचा ठपका भूमिपुत्रांवर ठेवण्याचे कारस्थान केल्याचा आरोप भूमिपुत्र संघटनेने केला.
राजेंद्र केरकर यांच्यावर आरोप
दरम्यान, पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांच्यावरही भुमिपुत्र संघटनेने आरोप केले आहेत. राजेंद्र केरकर हे पर्यावरणाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. डोंगरावर व एकूण करंझोळ भागातील पर्यावरण जपण्याचे काम पूर्वजांनी व आताच्या भूमिपुत्रांनी केलेले आहे. यामुळे भूमिपुत्रांवर आरोप करून जनमानसात आपली प्रतिमा उजळविण्यासाठी राजेंद्र केरकर हा खटाटोप करीत आहे मात्र भूमिपुत्रांच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न राजेंद्र केरकर यांनी करू नये अन्यथा त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गावस यांनी दिला. ज्यावेळी वनखात्याने भुमिपुत्रांवर गुन्हे दाखल केले, त्याचवेळी करंझोळ व इतर गावातील भूमिपुत्र पेटून उठले. म्हादई अभयारण्याचे कार्यालय व राजेंद्र केरकर यांच्या घरावर मोर्चा नेण्याची पूर्वतयारी करण्यात आली होती मात्र लॉकडाऊनमुळे सदर पाऊल उचलले नाही. मात्र येणाऱया काळात पुन्हा असा प्रयत्न झाल्यास अभयारण्याच्या कार्यालयावर व राजेंद्र केरकर यांच्या घरावर निश्चितपणे मोर्चा नेण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
राज्यपालांना निवेदन सादर
सत्तरी भूमिपुत्र संघटनेने राज्यपालांना निवेदन सादर केले आहे. त्यात, ज्या भूमिपुत्रांच्या जमिनीवर सरकारचा ताबा आहे, तो त्वरित काढून घेऊन त्यांना पूर्ण मालकी हक्क द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी ताबडतोब करावी, अशी मागणी संघटनेचे कार्यकर्ते आंतानियो पिंटो यांनी केली आहे. सत्तरीतील भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळणे गरजेचे आहे कारण जमिनीची मालकी नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या दहा वर्षांपासून संघटनेचे कार्य अत्यंत सक्रियपणे पुढे येत आहे.
रानव्यवस्थापन होणे गरजेचे
सध्या वन खात्यातर्फे रान व्यवस्थापन होणे ही काळाची गरज बनली आहे कारण रान व्यवस्थापन नसल्याने रानटी जनावरांचा कळप मोठय़ा प्रमाणात लोकवस्तीमध्ये घुसू लागला असून याला सर्वस्वी वनखात्याची यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप सहदेव गावडे यांनी केला. जंगलामध्ये चारा उपलब्ध नसल्यामुळे ही रानटी जनावरे लोकवस्तीकडे येऊ लागली आहेत व त्यामुळे त्यांच्या मागोमाग वाघासारखे प्राणीही लोकवस्तीमध्ये येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपले कार्य पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठीच ः राजेंद्र केरकर
आपण आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या निधीचा गैरवापर केलेला नाही. आपली सेवा ही पूर्णपणे पर्यावरण रक्षण व संवर्धनाच्या दृष्टीकोनातून सीमित आहे. काहीजण आपल्यावर आरोप करीत असले तरी त्याची मला अजिबात तमा नाही. आपण ज्या संस्कृतीमध्ये वाढलो त्या संस्कृतीचे रक्षण करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक समित्यावर कार्यरत असताना कोणत्याही प्रकारच्या निधीचा वापर गैर कामासाठी न करता पर्यावरण रक्षणाचे काम करण्यासाठी वापरण्यात आलेला आहे. यामुळे मला कसल्याही प्रकारची भीती नसून आतापर्यंत अनेक प्रकारच्या संघर्षांना तोंड देत आपण आपल्या कार्याचा प्रवास चालू ठेवलेला आहे. यामुळे येणाऱया काळातही आपले काम अजिबात खंडीत होणार नसून कोणत्याही प्रकारच्या धमक्मयांना भीक घालने हा माझा धर्म नाही. यामुळे कोणीही कोणत्या प्रकारचे आरोप केले असले तरीही मी माझ्या कार्यापासून अजिबात डगमगणार नसल्याचे राजेंद्र केरकर यांनी स्पष्ट केले आहे.