आपल्या आसपासच्या सृष्टीतील प्राणी, पक्षी, कीटक, वृक्ष यांची विविधता खरोखरीच थक्क करणारी आहे. अगदी आजही त्यांच्या नव्या जाती सापडत आहेत. आपण निसर्गाची सतत कत्तल करून त्यांचा जगण्याचा अधिकारच हिरावून घेत आलो आहोत. पण खरी गोष्ट अशी आहे की ते जगले तरच आपण जगू !
1970 च्या सुमारास वन्यप्राणी म्हणजे कोणते रे भाऊ? असा प्रश्न विचारण्याची वेळ येणार असे वाटू लागले होते. कारण वन्यप्राणी आणि इतरही घटकांची शिकार व चोरटा व्यापार यांचे प्रमाण वाढू लागले होते की त्यापैकी बरेचसे कायमचे नष्ट होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. याबाबत जागृती करण्यासाठी युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाने वन्यजीवन दिवस ठरविला. नामशेष होण्याचा धोका असलेल्या वन्य सृष्टीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा (ण्घ्ऊSिं) 3 मार्च 1973 रोजी 180 देशांनी मान्य केला म्हणून या दिवसाला महत्त्व आहे.
जंगली पशुपक्ष्यांची शिकार तसेच त्यांचा आणि दुर्मिळ वनस्पतींचा चोरटा व्यापार तेथील स्थानिकांच्या मदतीशिवाय शक्मयच होणार नाही. त्यामुळे असे न करण्याबाबत सर्वप्रथम त्यांना समजावले पाहिजे.
निसर्गाच्या साखळीतला प्रत्येक घटक किडय़ांपासून सिंहापर्यंत पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी महत्त्वाचा आहे ही बाब सर्वांनी ध्यानात ठेवली पाहिजे. जगामध्ये अनेक ठिकाणी जंगले नष्ट होत असताना आणि तेथील जैवविविधता संपुष्टात येत असताना भारतात मात्र वन्यजीवांचे अतिशय चांगल्या प्रकारे संरक्षण केले जात आहे. मात्र त्याचवेळी चोरटया शिकारीमुळे या प्रयत्नांमध्ये अडथळे येत आहेत. ही समस्या केवळ भारतातच नव्हे तर जगात सर्वत्र मोठया प्रमाणावर दिसून येत आहे.
भारताच्या समृद्ध परंपरेचा केंद्रबिंदू म्हणजे वन्यजीव. बंगालचे वाघ, आशियातील एकशिंगी गेंडे, भारतीय मोर आणि अशा इतर अनेक वैशिष्टयपूर्ण वन्यप्राण्यांचे सुरक्षित वसतिस्थान बनण्यासाठी भारतामध्ये अतिशय पोषक वातावरण आहे. या वन्यजीवांचे भारतात विशेष महत्त्व आहे. तेथील राष्ट्रीय चिन्हांमध्ये त्यांचे दर्शन घडत असतेच. पण त्याचबरोबर भारताचे पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि संस्कृती यामध्ये वन्यजीव महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अलीकडच्या काही वर्षात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत आहे. लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक प्रजातींचे संरक्षण विविध योजनांमुळे झाले आहे.
वन्यजीव तस्करीची समस्या
एकीकडे लुप्त होणाऱया प्रजातींना वाचवण्यात यश आले असले तरी दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी ही एक मोठी समस्या बनली आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय वन्यजीव संरक्षकांच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक होत चालली आहे. हस्तिदंत, गेंडयाचे शिंग आणि वाघाच्या शरीरातील विविध अवयव यांच्या चोरटया व्यापाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
जगभरात या व्यापारातून दरवषी 35 हजार ते 70 हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वन्यजीवांच्या तस्करीमुळे कायदा आणि सुरक्षा व्यवस्था, गुन्हेगारी टोळय़ांचा निधी यासारखे प्रश्न उपस्थित होण्याबरोबरच जंगलातील त्यांच्या अशा मुक्त संचारामुळे जंगलात राहणाऱया स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ लागला आहे.
एकत्रित प्रयत्नांची गरज
अलीकडेच झालेल्या पूर्व आशियाई देशांच्या परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन या दोघांनीही वन्यजीवांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी लढा उभारण्यावर भर दिला होता. यासाठी सरकार आणि सर्वसामान्य नागरिक, स्वयंसेवी संस्था व खासगी क्षेत्र या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आणि सहकार्याची गरज आहे.
वन्यजीवांच्या हानीची चिंता
वन्यजीव आणि वन उत्पादने यांच्या तस्करीची झळ प्रत्यक्ष वन्यजीवांनाच बसत असते. होणाऱया हानीचा वन्यजीव हाच केंद्रबिंदू असतो. वन्यजीवांच्या तस्करीमध्ये घरी सहजपणे पाळता येणारे वन्यजीव, सरपटणाऱया प्राण्यांची कातडी आणि काही प्रमाणात हस्तिदंत व गेंडयाच्या शिंगांचा समावेश असतो.
भारताचे प्रयत्न कौतुकास्पद भारतात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक वाटते. या प्रयत्नात भारतातील वन्यजीव संरक्षक आणि संस्थांसोबत गेल्या अनेक दशकांपासून असलेल्या सहभागाचा अभिमान आहे.