ऑनलाईन टीम / मुंबई :
‘वय झालंय…. त्यात कोरोना ही झालाय, जगून तरी काय उपयोग आता मरूनच जातो…’ कोरोनाग्रस्त ज्येष्ठ नागरिकाच्या व्यथेचा अनुभव सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे सांगत होते. वाढत्या वयाचे आजार आणि त्यात कोरोना संसर्ग यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नैराश्यतेने जखडले आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण सुरुवातीपासून अधिक असल्याने डॉक्टर ही त्यांच्या शारीरिक उपचारासह मनोबल वाढविण्यासाठी समुदेशन करून काळजी घेत असल्याचे राज्य सरकारी रुग्णालय सेंट जॉर्ज रुग्नालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले.
राज्यात 3 लाख 30 हजार 841 ज्येष्ठ नागरिक कोरोना आजाराशी लढत आहेत. यातील काही जण जोखमीच्या आजाराने ग्रस्त ही आहेत. त्यात त्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. दरम्यान अशा रुग्णांची मानसिक स्थिती समजून घेतली जात आहे. कोरोना उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्ण अन्य आजाराच्या रुग्णा पेक्षा वेगळा असतो. अन्य आजारातील रुग्णाला कुटुंबीय भेटू शकतात. मात्र कोरोना रुग्णांना कुटुंबीय-नातेवाईक-मित्र परिवार भेटू शकत नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये अधिक नकारात्मक विचार येत असतात. तरीही काही कोव्हीड सेंटर मधून रुग्ण फोन वरून नातेवाईकांशी बोलण्यास परवानगी आहे. सध्या अशा रुग्णांच्या मानसिक स्थितीचा विचार करून समुपदेशन केले जात असल्याचे डॉ खोब्रागडे म्हणाले.
एक ते दोन ज्येष्ठ रुग्ण नैराश्य मांडणारे आहेत. हे प्रमाण कमी आहे. वयानुसार असे नैराश्य येते. त्यांचे समुपदेशन सुरु आहे. वॉर्ड मधील सर्वांना समुपदेशन केल जात आहे. ग्रुप व वैयक्तिक समुपदेशन ही केल जात असल्याचे डॉ. खोब्रागडे म्हणाले. म्हातारपणातील आजार आणि त्यात कोरोना यामुळे त्यांच्यात नैराश्यात आली आहे. असे असले तरी बहुतांश ज्येष्ठ नागरिक कोरोनातून सावरत असल्याचे ही चित्र आहे.
आकडेवारीनुसार ज्येष्ठ नागरिक रुग्ण संख्या :आज राज्यात 61-70 वर्षातील 202922 जण कोरोना उपचार घेत आहेत तर 71-80 वयोगटातील 97041 जण उपचार घेत आहेत. 81-90 वयोगटातील 27371 रुग्ण दाखल आहेत. तर 91-100 वयोगटातील 3489 रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत. 101-110 वयोगटातील 17 जण कोरोनाशी लढत आहेत. असे एकूण 3 लाख 30 हजार 841 ज्येष्ठ नागरिक कोरोना ग्रस्त आहेत.