अवास्तव खर्च टाळून पुरोगामी पद्धतीने मूळगावी मेरडा येथे केला मुलीचा विवाह : नियमाची काटेकोर अंमलबजावणी
वार्ताहर / खानापूर
जगावर महामारी आली आहे. खेडोपाडी कोरोनाने आपली हजेरी लावली असून गावांगावांत कोरोनामुळे वातावरण तापले आहे. धनदांडगे लोक कोरोनाची नियमावली धाब्यावर बसवून आपले कार्यक्रम थाटामाटात करण्यात धन्यता मानत असताना खानापूर तालुक्मयातील मेरडा गावचे सुपुत्र गोव्याचे वरिष्ट पोलीस अधिकारी सी. एल. पाटील यांनी आपली कन्या चि. सौ. कां. रचना पाटील हिचा विवाह चिं. सोहन याच्याशी पुरोगामी पद्धतीने दि. 08 मे 2021 रोजी घडवून आणून बहुजन समाजाबरोबर वरि÷ आधिकाऱयांना आदर्श घालून दिला आहे. लग्नातील अवास्तव खर्च टाळून लग्न समारंभ पार पाडला. अक्षतामुळे होणारे तांदळाचे नुकसान टाळण्यासाठी फुलांच्या पाकळय़ांचा वापर करण्यात आला. वधुसाठी असणाऱया महागडय़ा रूकवतीला फाटा देऊन करण्यात आलेला विवाह फक्त अडतीस व्हराडींच्या साक्षीने पार पाडण्यात आला.
अन् लग्न सोहळय़ाचे स्वरूपच बदलले
विशेष म्हणजे वधु-वर दोघेही अभियंते असताना कोणत्याही प्रकारच्या मोठेपणाची अपेक्षा न ठेवता एकमेकांना मालार्पण करून लग्न सोहळय़ाचे स्वरूप बदलले. एक वरिष्ट पोलीस अधिकारी असूनही कोणताही गाजावाजा न करता महागडय़ा निमंत्रण पत्रिका, भेटवस्तू व आहेराची देवान घेवान, सजवलेला लग्न हॉल, वाजंत्री, शहनाई आणि डॉल्बी या सारख्या गोष्टी वगळून पार पाडलेल्या लग्नाची चर्चा सध्या खानापूर तालुक्मयात सुरू आहे.
एका पोलीस अधिकाऱयांने जपली सामाजिक बांधिलकी
कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांचे नाव सर्वश्रुत आहे. त्या अधिकाऱयांने संसारी व सामाजिक बांधिलकी जपताना एक अनोखे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. समाजाने याचे अनुकरण करुन लग्न समारंभात भावनेपेक्षा जिव्हाळय़ाला महत्त्व देत त्याचे पावित्र्य वाढवावे हाच या पाठीमागचा उद्देश आहे.
केवळ 38 जणांनाच निमंत्रण देऊन खर्चाला दिला फाटा
सध्या कोरोना महामारीचा गंभीर काळ आहे. शासनाने विवाह समारंभाला बंधने घातली आहेत. परंतु अनेक ठिकाणी थाटामाटात व अवाढव्य खर्च व माणसे जमा करुन विवाह सोहळे पार पाडले जात आहेत. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. खानापूर तालुक्मयात अनेक गावात विवाह सोहळे होताना अक्षरशः भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत वरिष्ट पोलीस अधिकारी सी. एल. पाटील यांनी महिनाभरापूर्वी नियोजित असलेल्या आपल्या मुलीचा विवाह सोहळा नियोजित तारखेनुसार दि 8 रोजी केवळ 38 लोकांच्या उपस्थितीत पार पाडून मोठेपणाला फाटा देऊन तसेच प्रशासकीय नियमावलीचे पालन करत त्यानी कार्य सिद्धीस नेले.