रोडवर ठिकठिकाणी अतिक्रमण : भाजी विपेत्यांच्या गर्दीमुळे वाहतुकीस अडथळे : रस्त्यावरील अडचणी दूर करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
राकसकोप जलाशयाला जाणाऱया रामघाट रोडवर ठिकठिकाणी अतिक्रमण झाले असून भाजी विपेत्यांच्या गर्दीमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. रस्त्यावर थांबविण्यात येणाऱया वाहनामुळे रस्ता अपुरा पडू लागला असल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील अडचणी सोडविण्याची मागणी होत आहे.
शहर व ग्रामीण भागातील काही रस्त्यांवर मोठय़ाप्रमाणात वर्दळ वाढली असून महत्त्वाचे रस्ते म्हणून ओळखले जातात. रामघाट रोडदेखील तितकाच महत्त्वाचा बनला असून शहराची व्याप्ती लक्ष्मी टेकडीपर्यंत असली तरी शिवमनगरपर्यंतच्या रस्त्यावर रहदारी वाढली आहे. बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये विविध वसाहती वाढल्याने या रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढली आहे. तसेच या रस्त्याला व्यावसायिक स्वरुप आले आहे. रस्त्याशेजारी विविध व्यापारी संकुले निर्माण झाली असून रहिवासी संकुलेदेखील निर्माण झाली आहेत. रामघाट रोड सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येते. वाढलेल्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष्मी टेकडी ते ज्योतीनगरपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करून रस्त्याचा विकास केला आहे. पण रुंदीकरण केलेला रस्तादेखील अपुरा पडू लागला आहे. रस्ता करताना काही मंदिरे आणि काही इमारती हटविण्यात आल्या नाहीत. परिणामी त्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
पाईपलाईन रोड कॉर्नर व पार्वती लेआऊट कॉर्नर आणि गणेशपूर बसथांबा ते ज्योतीनगरपर्यंत रस्त्यावर दोन्ही बाजूने अस्ताव्यस्तपणे पार्क करण्यात येणारी वाहने आणि भाजी विपेत्यांमुळे रस्त्यावर अडचण निर्माण होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण झाले असल्याने वाहतुकीस अडचण होत आहे. अशातच वाहने थांबविण्यात येत असल्याने रस्ता अपुरा पडू लागला आहे. पाईपलाईन रोडवरील मारुती मंदिर परिसरात प्रवाशी रिक्षांच्या रांगा लागलेल्या असतात. अशातच या ठिकाणी पाणीपुरी व भाजी विपेत्यांची गर्दी असते. तसेच याठिकाणी बसथांबा असल्याने बस आणि प्रवासी वाहने थांबतात. दुसऱया बाजूला पेट्रोलपंपाच्या समोर जेसीबी आणि टिप्पर थांबविण्यात येतात. तसेच दुचाकी वाहन दुरुस्तीच्या गॅरेजची वाहने रस्त्यावर थांबविलेली असतात. या बाजूला देखील भाजी विपेत्यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे या कॉर्नरवर वर्दळ वाढली असून पादचाऱयांना आणि वाहनधारकांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे.
भाजी विपेत्यांना शिस्त लावण्याची मागणी गणेशपूर गणपती मंदिर परिसरात देखील वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून मंदिरासमोरील गर्दीमुळे पादचारी आणि वाहनधारकांचे जीव धोक्मयात आले आहेत. याठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूने भाजी विपेत्यांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे भाजी खरेदी करणारे ग्राहक वाहने रस्त्यावर पार्क करीत असल्याने वर्दळीत आणखीनच भर पडत आहे. अशातच बसथांबा असल्याने बस थांबल्यास दुसऱया वाहनांना जाण्यास रस्ता नसतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. पाईपलाईन ते ज्योतीनगरपर्यंतचा रस्ता वर्दळीचा बनल्याने दररोज अपघात घडत आहेत. परिणामी हा रस्ता वाहनधारक आणि पादचाऱयांना धोकादायक बनला असून जीवघेणा बनत चालला आहे. त्यामुळे रामघाट रोडवरील अतिक्रमणे हटवून वाहनधारक आणि भाजी विपेत्यांना शिस्त लावण्यात यावी, अशी मागणी होत आहे.