गोडोली /प्रतिनिधी
वर्ये गावातील कोरोना पॉझिटिव्ह आलेला युवक गावात कोणाच्याही संपर्कात आला नव्हता. त्या दरम्यान कोणताही सार्वजनिक कार्यक्रम झाला नसल्याचे वर्ये गावातील आपत्ती व्यवस्थापन समितीने खुलासा केला आहे.
सर्वत्र कोरोनाची धास्तीने वातावरण तणावचे असताना वर्ये येथील पुण्यात असणाऱ्या युवकाचा रिपोट पॉझिटिव्ह आल्याने गाव सील केले. त्या प्रसारमाध्यमांनी तो युवक गावात एक दिवस आल्यावर सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याची चुकीची माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन समितीने याबाबत सखोल माहिती घेतली असता प्रत्यक्षात तो फक्त कुटुंबाच्या संपर्कात आला, अन्य कोणाच्याही संपर्कात नसल्याने समोर आले. सदर युवकांने कुठेही वाढपी म्हणून सहभागी झाला नसल्याचा खुलासा केला आहे. गावात याबाबतची माहिती दिल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.