तालुक्मयात मृग नक्षत्राच्या तोंडावर वळिवाची हजेरी : पेरणी-मशागतीच्या कामांमध्ये व्यत्यय
वार्ताहर / किणये
तालुक्मयाला वळीव पावसाने पुन्हा झोडपले आहे. गुरुवारी सायंकाळी तालुक्मयाच्या सर्रास भागात पाऊस झाला. यामुळे पेरणी व मशागतीच्या कामांमध्ये व्यत्यय निर्माण झाला आहे. वारंवार होणाऱया वळिवामुळे शेतकऱयांचे मात्र मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून आता पेरणी कशी करावी, याची चिंता बळिराजाला लागून राहिली आहे.
दि. 8 जून रोजीपासून मृग नक्षत्राला सुरुवात होणार आहे. यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून तालुक्मयात धूळवाफ पेरणी जोमाने सुरू होती. पावसामुळे ही पेरणीची कामे आता खोळंबली आहेत.
गुरुवारी सकाळीही बहुतांश शिवारांमध्ये पेरणीची लगबग सुरू होती. कोणी बैलजोडीने तर कुणी ट्रक्टरच्या साहाय्याने पेरणी करीत होते. काही शिवारांमध्ये माणसांनी कुरी ओढून पेरणी चालू होती.
गुरुवारी सकाळपासूनच उष्म्यामध्ये वाढ झाली होती. दुपारी चारनंतर ढग दाटून आले व पाचनंतर तालुक्मयात जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतात असलेल्या शेतकऱयांची तारांबळ उडाली होती. काही शेतकरी पेरणी करीत होते. पावसामुळे पेरणी अर्धवट सोडूनच घरी परतावे लागले.
गेल्या दहा-बारा दिवसांपूर्वी तालुक्मयात जोरदार वळीव पाऊस झाला होता. यामुळे शेत-शिवारांमध्ये पाणी साचले होते. सध्या चार-पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे पेरणी व मशागतीची कामे जोमाने सुरू होती. पण गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे काही पाणथळ शिवारात पुन्हा पाणी साचले असून पेरणी करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. भातपेरणीसह बटाटा, भुईमूग आदी पिकांच्या लागवडीसाठी व पेरणीसाठी शेतकरी शिवारात मशागत करीत आहेत. ही मशागतही खोळंबली आहे. पेरणीची कामे पूर्ण करण्यासाठी मृग नक्षत्रापर्यंत तरी पावसाने उघडीप देण्याची गरज आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.