प्रतिनिधी/सांगली
बहुचर्चित वसंतदादा शेतकरी बँकेसह 21 सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. दहा वर्षाहून अधिक काळ अवसायक असलेल्या संस्थाबाबत सहकार विभागाने हा निर्णय घेतला आहे. अवसायक नियुक्ती असूनही नोंदणी केवळ कुपवाड अर्बन बँकेची नोंदणी मात्र वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सांगली जिल्ह्यातील सहकाराला गेल्या एक तपापासून ग्रहण लागले आहे. घोटाळयामुळे बँका आणि पतसंस्था अडचणीत येण्याची मालिकाच सुरू झाली होती. ती अद्याप थांबली नाही. अनेक संस्थांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अवसायकांकडेही बऱयाच संस्थांचा ताबा दहा वर्षाहून अधिक काळ आहे. सहकार विभागाने आता दहा वर्षापेक्षा अधिक काळ अवसायक नियुक्ती असणाऱया संस्थांची नोंदणीच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये वसंतदादा शेतकरी बँकेसह दि मिरज अर्बन को ऑप. बँक, यशवंत सहकारी बँक मिरज, हनुमान नागरी सह. पतसंस्था सांगली, वसंतदादा बिगर शेती सह.पतसंस्था कवलापूर, कृष्णेश्वर नागरी सह. पतसंस्था मिरज, मिरज शहर खोकी मालक नागरी पतसंस्था, चिंतामणी नागरी सह. पत संस्था, संगुदादा बोंद्रे नागरी सह. पतसंस्था हरिपूर, अजिंक्य नागरी सह. पतसंस्था सांगली, दि मिरज अर्बन को ऑप बँक कर्मचाऱयांची सह. पतसंस्था, वसंतदादा शेतकरी सहकारी बँक सेवक पतसंस्था, भाग्यलक्ष्मी नागरी सह. पतसंस्था सांगली, मुस्लीम जनता नागरी सह. पतसंस्था, सांगली, गुरूकृपा नागरी सह. पतसंस्था सोमेश्वर ग्रामीण बिगरशेती बिळाशी, धनलष्म्ली महिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्था खरसिंग, वसंतदादा सहकारी शाबू प्रकल्प रामानंदनगर ,कपिल कृषि पूरक व प्रक्रिया सह.संस्था शिवणी, युगांतर ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था कडेगाव, श्रीराम ग्रामीण बिगर शेती सहा.पतसंस्था नेवरी या संस्थांचा समावेश आहे.
या 21 संस्थासह कुपवाड अर्बन बँकेवरही 2009 पासून अवसायकांची नियुक्ती आहे. परंतु या संस्थेची वसुली आणि ठेवीदारांच्या ठेवीही परत करण्यात बऱयाच प्रमाणात यश आले आहे. त्यानंतर बँकेची नोंदणी रद्द करू नये यासाठी सभासद आणि संस्था चालकांनी रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे ही बँक वगळता अन्य 21 संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.
वसंतदादा बँकेच्या पुनर्ज्जीवनाची चर्चा हवेतच
वसंतदादा शेतकरी बँकेवरही 2009 पासून अवसायकांची नियुक्ती आहे. दोन वर्षापुर्वी अवसायकांना मुदतवाढ नाकारत बँकेची नोंदणी रद्दचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सहकार विभागाच्या अप्पर आयुक्तांनी काढला होता. त्यावर माजी महापौर सुरेश पाटील यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकाराने र्बॅकेच्sा पुनर्ज्जीवन करण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर वसुलीसाठी अवसायकांच्या मदतीला राज्य बँकेचे अधिकारीही देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. अवसायकांच्या काळात बँक वाचवण्याऐवजी गैरव्यवहारच झाल्याचे आरोपही करण्यात आले होते. वसंतदादा यांच्या नावासाठी तरी या बँकेचे पुनर्ज्जीवन करण्यात येईल अशी जिल्ह्यातील दादाप्रेमींची अपेक्षा होती. परंतु या बँकेची नोंदणी रद्द करण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.
नोंदणी रद्द झाली तरी मालमत्तेचा ताबा सहकार कडेच ः करे
या सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार असली तरी त्यांच्या मालमत्तांचा ताबा सहकार विभागाकडेच राहणार आहे. वसुली करणे, थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई, अथवा ठेवी परत देणे या कायदेशीर बाबी सहकार विभागामार्फत सुरूच राहतील, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी दिली.