शेवटचे पुष्प लेखिका डॉ. संध्या देशपांडे गुंफणार
प्रतिनिधी / बेळगाव
हेरवाडकर शाळेत सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प लेखिका संध्या देशपांडे गुंफणार आहेत. कोविड नियमामुळे हे व्याख्यान गुरुवारी सायंकाळी 5 वा. होणार आहे. ‘जागतिक विचारवंतांचा भारतीयांवर प्रभाव’ या विषयावर त्या बोलणार आहेत.
डॉ. संध्या देशपांडे यांचा परिचय पुढीलप्रमाणे
एमएला मराठी विषयात कर्नाटक विद्यापीठात प्रथम आलेल्या व राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झालेल्या डॉ. संध्या देशपांडे यांच्या ‘1985 नंतरच्या मराठी नाटकाचे स्वरुप’ या प्रबंधास कर्नाटक विद्यापीठाची डॉक्टरेट तर ‘एकांकिका स्वरुप आणि विकास’ या प्रबंधास पुण्याचा भगवान पंडित पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या ‘अश्वदा’, ‘सुलतान’ आणि ‘बी पॉझिटिव्ह’ या कादंबऱया तसेच ‘अंतस्थ’, ‘जीना इसी का नाम’, ‘मेघ बंधन’ ‘कहानी गोवा मुक्तिसंग्रामाची’ ही नाटके प्रकाशित झाली आहेत. ‘अजन्मा मदन’ हे दीर्घकथा काव्य, गानगंगा गंगुबाई हनगल, मानवतावादी बसवण्णा ही चरित्रे तसेच तिची कथाच वेगळी हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे.
त्यांनी लिहिलेल्या पथनाटय़ांचे गोवा, कर्नाटक, महाराष्ट्रात 500 हून अधिक प्रयोग झालेले आहेत. ‘सखाराम बाईंडर’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘घर तिघांच हवं’, देहभान अशा अनेक नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले. लेखन, अभिनय, दिग्दर्शन यासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नाटय़ांकुर, शब्दगंध या संस्थांची स्थापना त्यांनी केली आहे. शारदोत्सव सोसायटीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. अनेक काव्य, नाटय़विषयक कार्यक्रमांचे संयोजन व निर्मिती केली आहे. त्यांना वुमन्स अचिव्हर अवॉर्ड, नाटय़भूषण पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, धनुर्धारी मुंबई, सीरी गन्नड राष्ट्रीय प्रति÷ान पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
आजचे व्याख्यान सायंकाळी 5 वाजता वेळेवर सुरू
सरकारने जाहीर केलेल्या नूतन नियमावलीमुळे आजचे व्याख्यान सायंकाळी 5 वा. वेळेवर सुरू होईल, सभासद व रसिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन अध्यक्षा मीना खानोलकर यांनी केले आहे.