वसगडे / वार्ताहर
सांगली- सातारा या जुन्या मार्गावरील वसगडे ता.पलूस येथील रेल्वे गेटच्या दाेन रुळा मधील असणारा डांबरी रस्ता उखडल्याने अवजड वाहने मध्येच अडकुन राहत आहेत. उड्डाण पुलाचे चालु काम बंद पडल्याने गेट जवळील दाेन्ही बाजुच्या रस्त्याची दुरावस्था हाेऊन परिसर धाेकादायक बनला आहे.
पलूस हुन सांगलीकडे जाणार्या वाहनाची संख्या जास्त असते तसेच क्रांती, साेनहीरा, सांगली कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतुक सध्या जाेमात सुरु आहे. ऊसाने भरलेला ट्रक्टर रुळावरुन पास करताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत अाहे. विस टनाचे लाेड अोढताना मागिल ट्राली अडकुन राहत ट्राफिक जामच्या घटना घडत घडत आहेत. वारंवार अवजड वाहणे अडकल्यास रुळ उखडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने प्रवासी, वाहनधारकांमधुन नाराजी व्यक्त हाेत आहे.
रेल्वेच्या महारेलकडून सुरु असलेले उड्डाण पुलाचे काम बंद पडले आहे. त्यामुळे आजुबाजुच्या शेतकर्यांचे नुकसान हाेत असुन काम तात्काळ सुरु करण्याची मागणी माजी संरपच अनिल पाटील यांनी केली आहे. तसेच खा. संजय काका पाटील यांनी हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांमधून हाेत आहे.