अभाविपचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीनंतर महाविद्यालये सुरू करण्यात आली. वसतिगृहेही सुरू करण्यात आली आहेत. मात्र केवळ पदवीपूर्ण विद्यार्थ्यांनाच सवलत देण्यात आली आहे. अकरावी व बारावी विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आली नाही. त्यामुळे गोंधळ उडत आहे. तेव्हा हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी सर्वांनाच मुभा द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) तर्फे जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली आहे.
महाविद्यालयांमध्ये मोठा गोंधळ उडत आहे. कोरोनाच्या महामारीनंतर ही महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अकरावी-बारावी विद्यार्थ्यांचीही शाळा सुरू झाली असून त्यांनाही राहण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. तातडीने ही समस्या सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला.
एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी किरण दुकानदार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.