प्रतिनिधी, बेळगाव
नेहरुनगर येथील मॅट्रीकपुर्व विद्यार्थी वसतीगृहातील 45 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे. यापैकी 20 हून अधिक विद्यार्थिनींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे. उर्वरित विद्यार्थिनींवरही उपचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.