जयभीम ओमसाई संघटनेचे निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गरिबांना घरे द्यावीत, या मागणीसाठी जयभीम ओमसाई संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. गरीब कुटुंबांना घरे देण्याचे आश्वासन अनेकवेळा देण्यात आले. मात्र, अजूनही त्यांना घरे देण्यात आली नाहीत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असून तातडीने घरे मंजूर करण्यात यावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. श्रीमंतांनाच विविध योजना दिल्या जात आहेत. पहिल्या ज्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या त्यामध्ये अनेकांची नावे आहेत. मात्र, त्यांना घरे देण्यात आली नाहीत. तेव्हा जे या योजनेस पात्र आहेत त्यांनाच घरे द्यावीत, असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी राजू ठोंबरे, चरणसिंग धमुणे, अनिल ठोंबरे, राधा दुर्गाई, कलावती ठोंबरे, निलप्पा रंगापुरी, अनिता धमुणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.