एका आंब्याच्या झाडावर विविध प्रकारचे आंबे येणे ही बाब आता नवीन राहिलेली नाही. तथापि, वांग्याच्या झाडाला टोमॅटो लटकणे हा प्रयोग मात्र नवीन आहे. ग्राफ्टिंग तंत्रज्ञानाचा उपयोग करून ही किमया झारखंड येथील गोड्डा या गावात एका शेतकऱयाने केली आहे. देशात जाणवणाऱया भाज्यांच्या टंचाईवर असे प्रयोग उपाय ठरू शकतील, असे या शेतकऱयाचे मत आहे.
वांगी आणि टोमॅटो यांचे हे झाड महिन्याला 40 किलोहून अधिक उत्पादन देते, असे दिसून आले आहे. येथील कृषक संघाचे प्रमुख अमरेंद्र कुमार यांनी या प्रकारच्या लागवडीला विशेष प्रोत्साहन दिले आहे. वांगी आणि टोमॅटो या दोन भाज्या संपूर्ण भारतभर लोकप्रिय आहेत. त्यांचे उत्पादन वाढावे यासाठी हे प्रयोग करण्यात येत आहेत. गोड्डा येथील नर्सरीत अशी 600 रोपे तयार करण्यात आली असून येत्या दोन-चार वर्षात देशभर अशी झाडे दिसू लागण्याची शक्मयता आहे.
झारखंडमधील रांची येथेही कृषी वैज्ञानिक डॉ. विजय यांनी असे प्रयोग केले आहेत. रांचीतूनच हा प्रयोग गोड्डा येथे सुरू झाला, असे त्यांचे म्हणणे आहे. अशाप्रकारच्या दोन वेगवेगळी पिके देणाऱया झाडांमुळे ऑफसिझनमध्येही ग्राहकाला टोमॅटो किंवा वांगी मिळू शकतील. अशाप्रकारे पिकविण्यात आलेल्या या फळभाज्यांची चव नेहमीसारखीच असून त्यांची पोषकद्रव्ये व इतर गुणधर्मांवरही कोणताही विपरित परिणाम झालेला दिसून येत नाही. त्यामुळे सर्वदृष्टीने हा प्रयोग यशस्वी झाल्याचा विश्वास अमरेंद्र कुमार यांनी व्यक्त केला आहे.
आता या झाडांची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाणार असून काही वर्षातच हे प्रयोग लोकप्रिय होतील. तसेच अन्य भाज्यांच्या संदर्भातही ते केले जातील. ग्राहक सध्या हेल्थ कॉन्शस होत असल्याने आहारात भाज्यांचे आणि पालेभाज्यांचे प्रमाण वाढलेले दिसून येते. अशा भाज्या स्वस्त उपलब्ध होण्यासाठी त्यांचे उत्पादन कमी खर्चात वाढणे आवश्यक आहे. ही कसरत अशाप्रकारच्या प्रयोगातून साध्य केली जाऊ शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.