वाळपई प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील भिरोंडा पंचायत क्षेत्रातील वांते डोंगरवाडा येथील सार्वजनिक बांधकाम खात्याने अर्ध्यावरच रस्त्याचे काम बंद पडल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज सकाळी वाळपई सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी त्यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱयांना चांगल्याप्रकारे धारेवर धरले व काम बंद करण्यासंदर्भाची कारणे स्पष्ट करण्याची आग्रही मागणी केली. यामुळे सदर कार्यालयात बऱयाच प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. पंचायतीचे सरपंच उदयसिंग राणे यांच्या नेतृत्वाखाली या नागरिकांनी अनेक प्रकारचे प्रश्न विचारून अधिकाऱयांना भंडावून सोडले.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील भिरोंडा पंचायत क्षेत्रातील वांते डोंगरवाडा याठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याची डागडुजी करून त्यावर हॉटमिक्स डांबरीकरण करण्याची मागणी ाम नागरिकांनी केली होती. यासंदर्भात स्थानिक आमदार प्रतापसिंह राणे त्याचबरोबर आमदार व आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांच्याकडे अनेकवेळा यासंदर्भाची मागणी करण्यात आली. त्यांनी यासंदर्भात गांभीर्याने लक्ष देऊन सदर वाडय़ावरील रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणाला मान्यता मिळवून दिली होती. यासंदर्भाचे काम पंधरा दिवसांपूर्वी सुरू झाले होते. कामाच्या पहिल्या टप्प्यात रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे बुजविले व त्यावर हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार होते.
मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी सदर काम अचानकपणे बंद केल्यामुळे नागरिक संतप्त झाले.
यासंदर्भात अधिकाऱयांना जाब विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तो यशस्वी ठरला नाही यामुळे गावांमध्ये तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त करून आज सकाळी सरपंच उदयसिंग राणे यांच्या नेतृत्वाखाली वाळपई सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागात अधिकाऱयांची भेट घेऊन यासंदर्भात विचारणा करण्यात आली. मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी यावेळी अर्धवट अवस्थेत काम बंद करण्याचे कारण स्पष्ट करण्याची आग्रही मागणी केली. यासंदर्भात बोलताना अधिकाऱयांनी सांगितले की सदर रस्ता ज्या जमिनीतून जात आहे त्या जमिनीतील मालकांनी याला विरोध केल्यामुळे सदर काम बंद करावे लागले आहे. यावर प्रश्न करताना नागरिक व उपसरपंच उदयसिंग राणे यांनी सांगितले की यापूर्वी सदर भागांमध्ये डांबरीकरण रस्ता होता .सदर रस्ता अस्तित्वात असताना आता या रस्त्याची दुरूस्ती व डांबरीकरण करत असताना जमीन मालकाने अडविण्याचे कारण काय अशा प्रकारचा सवाल केला असता अधिकाऱयांनी यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांना त्यावर समाधान झाले नाही .अर्धवट अवस्थेत रस्ता काम बंद करणे त्याचप्रमाणे अस्तित्वात असलेल्या रस्त्याची दुरुस्ती बंद करणे म्हणजे खरोखरच नागरिकावर मोठा अन्याय असून यावर ताबडतोब उपाययोजना करावी अशा प्रकारची विनंती नागरिकांनी सदर अधिकाऱयासमोर केली. मात्र यासंदर्भात आपण कागदपत्रे सोपस्कार करणार असून गरज पडल्यास सरकार कायदेशीर मार्गाने ही जमीन ताब्यात घेण्याच्या संदर्भात प्रयत्न करणार असल्याचे अधिकाऱयांनी यावेळी स्पष्ट केले.
मामलेदार यांची भेट.
त्यानंतर संतप्त ग्रामस्था?नी सत्तरी तालुक्मयाचे मामलेदार अनिल राणेसरदेसाई यांची भेट घेऊन यासंदर्भाचा प्रकार त्यांच्या कानावर घातला .यावेळी मामलेदार अनिल राणे सरदेसाई यांनी सांगितले की अस्तित्वात असलेला रस्ता बंद करण्याचा कोणालाही अधिकार नाही. तरीसुद्धा कागदोपत्री कायदेशीर सोपस्कार या संदर्भात आपण लक्ष घालणार असून गरज पडल्यास जमिनीच्या मालकाला बोलवून यासंदर्भात आपण सविस्तरपणे चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थितांना स्पष्ट केले. दरम्यान अनेक वर्षापासून वांते डोंगरवाडा या भागातील नागरिकांना आपल्या दारांमध्ये हॉटमिक्स डांबरीकरण होणार असल्याचा आनंद झाला होता. मात्र काम अर्धवट अवस्थेत बंद झाल्यामुळे गोवा मुक्तीनंतर हॉटमिक्स डांबरी करण्याची सुविधा यानागरिकांच्या घरापर्यंत जाऊ शकत नसल्याचे दुर्दैव मात्र नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.दरम्यान सरपंच उदयसिंग राणे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की आरोग्यमंत्री विश्?वजित राणे व स्थानिक आमदार प्रतापसिंह राणे यांच्या खडतर प्रयत्नानंतर याठिकाणी हॉटमिक्स डांबरीकरण हाती घेण्यात येणार होते. मात्र नागरिकांच्या माहितीनुसार व अधिकाऱयांनी दिलेल्या एकूण कल्पनेनुसार जमीन मालकाने याला विरोध केल्यामुळे सदर काम बंद पडले असल्यामुळे नागरिकांचा पारा अनावर होणे सहाजिकच आहे. तरीसुद्धा गावांमध्ये कोणत्याही प्रकारचे संघर्ष निर्माण होणार नाही व रस्त्याचे काम त्वरित सुरू होण्याच्या दृष्टीकोनातून आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.