ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत देशातील लॉक डाऊन वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर काल मुंबईतील वांद्रे स्टेशनवर हजारो मजुरांनी आपल्या घरी जाण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी पोलिसांना त्यांच्यावर सौम्य लाठीमार करावा लागला. नंतर ही गर्दी कमी झाली.
या घडलेल्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला दोषी ठरवले. या साऱ्या प्रकारावर आता भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग यांने ट्विटर द्वारे सडेतोड मत मांडले आहे.
हरभजन सिंग आपल्या ट्विटमध्ये म्हणत आहे की, सगळ्यांना सुरक्षित ठेवायचे असेल तर संचारबंदी हाच योग्य पर्याय आहे. वांद्रे मध्ये घडलेली घटना अयोग्य आहे. नागरिकांना अजूनही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येत नाही आहे. ते स्वतः चा आणि आपल्याबरोबर दुसऱ्यांनाही जीव धोक्यात घालत आहेत.
आपल्या या पोस्ट मध्ये हरभजन सिंगने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आदित्य ठाकरे यांना ही टॅग केले आहे.