प्रतिनिधी / सातारा
वाई तालुक्यातील जांभळी येथे मुंबई हुन दि.17रोजी दोन कुटूंब ट्रव्हल्समधून आले होते.त्यातील एका कुटुंबातील सर्वजण बाधित झाले आहेत.आतापर्यंत एकाचा मृत्यू तर गुरुवारी रात्री उशिरा 6 यापूर्वीचा एक असे आठ कोरोना बाधित एकाच घरातील आहेत.दुस्रया कुटूंबातले सदस्यांना लक्षणे जाणवू लागल्याने प्रशासन त्यांचे स्वाब तपासणीकरता पाठवण्याची तयारी केल्याचे समजते.दरम्यान, वाई शहरात दोन रुग्ण आढळून आल्याने जे मायक्रो कंटेंटमेंट झोन केले आहेत.तेथे दुर्लक्ष प्रशासन करत असल्याचे नागरिकांचा मत आहे.ग्रामीण रुग्णालयाच्या त्या वैधकीय अधिकायाबाबत तीव्र नाराजी असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांच्याकडे तक्रार झाल्या आहेत.पालिका प्रशासनाने शहरात निर्जंतुक फवारणी सुरू केली आहे.
वाई तालुक्यातील गेल्या दोन दिवसापासून जांभळी हे गाव चर्चेत येऊ लागले.जांभळीमध्ये पहिला रुग्ण थेट दि.25रोजी एकाच्या कोरोना बाधेने मृत्यू झाल्यावर पटलावर आले.दि.27रोजी रात्री उशिरा एक बाधित आढळून आला तर दि.28 रोजी रात्री तब्बल 6 बाधित आढळून आले.त्यामुळे या एकाच गावाकडे तालुक्याचे लक्ष वेधले गेले. या गावात मुंबईहुन दि.17रोजी दोन कुटूंब लक्झरी ट्रव्हल्स करून आले.त्यातील एक कुटूंब हे होम कोरोन टाइन तर दुसरे कुटूंब शाळेत कोरोन टाइन करून रहात आहे.सुरुवातीला एका कुटुंबातील सदस्यांना लक्षणे जाणवू लागली.त्यातील एक मृत झाला तर गेल्या दोन दिवसात एकूण 8 रुग्ण गावात झाले आहेत.तर दुस्रयाची कुटूंबातील सदस्यांमध्ये लक्षणे आढळून आली आहेत.त्यांचे स्वाब तपासणीला घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. गावास प्रांत सॉ. संगीता राजापूरकर चौगुले, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी कुसुरकर, तालुका वैधकीय अधिकारी डॉ.यादव यांनी वारंवार भेटी दिल्या आहेत.
वाईच्या त्या डॉक्टरबाबत नाराजीचा सूर
वाई ग्रामीण रुग्णालयात महाबळेश्वर, खंडाळा, वाई येथील रुग्णाचे व संशयितांचे स्वाब तपासणी करण्याचे केंद्र आहे.मात्र, या केंद्रात जी काळजी घ्यायला हवी ती घेतली जात नाही.तेथील डॉक्टराना सूचना दिल्या गेल्या आहेत.आमदार मकरंद पाटील यांनी ही बजावून सांगितले तरीही त्यांच्याकडून म्हणावी तशी काळजी घेतली जात नसल्याने एका कर्मचायास कोरोनाची बाधा झाली.त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.स्थानिक नागरिकांनी तक्रारी ही केल्या आहेत.
मायक्रो कंटेंटमेंट झोनमध्ये प्रशासनाचे दुर्लक्ष
शहरात दोन रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने लगेच सर्व्हे करून परिसर सील केला.या सील केलेल्या परिसरातल्या नागरिकांना मूलभूत सुविधा पोहचत आहेत की नाहीत हे मात्र पाहिले जात नाही.कचरागाडी येत नाही, भाजीपाला नाही, दूध नाही, पालिकेने नियोजन करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
शहरात निर्जंतुक फवारणी सुरू
शिवसेनेचे वाई शहर प्रमुख किरण खामकर यांनी मागणी केल्यानुसार वाई पालिकेने शहरात ठिकठिकाणी निर्जंतुक फवारणी करण्यास सुरुवात केली आहे.त्याबद्दल वाई पालिकेचे नागरिक आभार मानत आहेत.