प्रतिनिधी/ वाई
वाई बाजार समितीच्या वतीने कोरोनो विषाणूंचा होणारा फैलाव रोखण्यासाठी पदाधिकारी, कर्मचारी व अधिकारी यांच्या मार्फत अनेक प्रकारच्या आवश्यक असणाऱया उपाययोजना जलदगतीने दररोज पूर्ण केल्या जात आहेत, अशी माहिती वाई शेती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली. वाई शहरातील नगरपरिषदेचे दहा वॉर्ड असून त्यातील 42 हजार नागरिकांची वस्ती आहे. या सर्व नागरिकांना जीवनावश्यक समजला जाणारा भाजीपाला घरपोच करण्यासाठी परवानाधारक असलेल्या व्यापाऱयांची नियुक्ती केली आहे.
त्यांना त्यांच्या वाहनांना परवाना देवून भाजी विक्रीची सोय केली आहे तर संपूर्ण वाई तालुक्यासह पाचगणी, महाबळेश्वर या दोन्ही पर्यटनस्थळासह आसपासच्या गावांना परवानाधारक व्यापाऱयांना त्यांच्या वाहनातून घरपोच करण्याची सुविधा वाईच्या बाजार समितीच्यामार्फत उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर वाई बाजार समितीमध्ये असणारे व्यापारी हे परवानाधारक असून येथील बाजार समितीच्या आवारात पहाटे 3 वाजल्यापासून वाई खंडाळा, जावली, कोरेगाव या चार तालुक्यातील हजारो शेतकऱयांनी पिकवलेल्या शेतीमालाची मोठय़ा प्रमाणात दररोज आवक होत असते. येथे येणारा भाजीपाला व इतर शेतीमालाच्या दर्जाची वाई बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी तपासणी करतात. योग्य प्रतीचा माल नसल्यास तो बाजार समितीच्या तळावर उतरून घेतला जात नाही. सध्या देशासह राज्यात कोरोनो रोगाचा फैलाव होवू नये म्हणून व जमावबंदीचे उल्लंघन येणाया शेतकयांकडून होवू नये यासाठी समांतर अंतर ठेवून काळजी घेतली जाते. पहाटे तीनपासून सुरू होणारी तरकारीची विक्री व खरेदी वाई, खंडाळा, जावली, कोरेगाव, महाबळेश्वर, खेड, महाड, चिपळूण, पोलादपूर, रोहा, माणगाव, अलिबाग या भागातील व्यापाऱयांच्याकडून मोठय़ा प्रमाणात सकाळी सहा वाजेपर्यंत तरकारीची लाखो रुपयांची खरेदी विक्रीचे व्यवहार दररोज होत केले जातात.
हे व्यवहार होत असताना जमावबंदीचे उल्लंघन होवू नये याची वेळोवेळी काळजी घेतली जाते. वाई बाजार समितीत जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन होवू नये म्हणून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, वाई प्रांत अधिकारी, तहसिलदार, उपर्निबधक आणि वाई पोलीस ठाणे या सर्वांचे येथील घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असते. बाजार समितीच्या आवारात ठिकठिकाणी हात धुण्यासाठी पाणी, साबण, सॅनिटायजर्स व हात पुसण्यासाठी स्वच्छ कपडे इत्यादी सोय उपलब्ध केली आहे. तसेच बाजार समितीच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत नागरिकांमध्ये नेमून दिलेले अंतर व तोंडाला मास्क लावणे गरजेचे केले आहे, अशी माहिती देण्यात आली.