प्रतिनिधी / वाई
पत्रकार अर्णव गोस्वामी यांनी पारदर्शकपणे बातम्या लावल्या आहेत. दूध का दूध पाणी का पाणी दाखवून दिले आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारने आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी बदलाच्या भूमिकेतून जुनी केस उकरून काढली आहे. ती केस कोर्टाच्या परवानगीशिवाय काढली गेली असून त्याचा निषेध वाई भाजपच्यावतीने किसन वीर चौकात करण्यात आला.