प्रतिनिधी/ औंध
वाकळवाडीत ता खटाव येथील आणखी दोन जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गाव हादरून गेले आहे, प्रशासनाच्या वतीने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.पोलीस पथके गावात तैनात झाली असून आरोग्य विभागाकडून पथके तैनात करण्यात आली आहेत,तर 20 स्वयंसेवक ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू पोहचविण्याचे कार्य करीत आहेत.
मुंबई येथून वाकळवाडी येथे पाच व्यक्ती 14 जून रोजी गावी आल्या होत्या,त्यापैकी 61 वर्षीय पुरुषाचा मृत्यु 18 जून रोजी गुरुवारी झाला होता,मृत्यू पश्चात त्या व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने घरातील संपर्कात असणाया व्यक्तींसह सहा जणांना विलगीकरण कक्षात हलविण्यात आले होते, पैकी 27 वर्षीय पुरुष व 35 वर्षीय महिला यांना कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वाकळवाडीत सन्नाटा पसरला आहे.
आसपासची गावे भयभीत झाली आहेत,प्रशासन तळ ठोकून वाकळवाडी गावात आहे,तर गावात येणाया सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत,225 कुटुंबसंख्या व 822 लोकसंख्या असलेल्या वाकळवाडीत आरोग्य विभागाच्या वतीने चार पथके गावात तैनात करण्यात आली आहेत,सर्वांचे थर्मल क्रीनींग,रक्तदाब, साखर,शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण इत्यादी गोष्टी घरोघरी जाऊन तपासल्या जात आहेत. 20 स्वयंसेवकांकडून घरपोच अत्यावश्यक किराणा,गॅस, भाजीपाला,दूध, औषधे पोहचवणे सुरू करण्यात आले आहे.गावकयांनी वेळोवेळी आपल्या घरातील सदस्यांनी काळजी घ्यावी,कोणाला कसलाही शारीरिक त्रास जाणवल्यास तात्काळ कळविण्याचे सांगण्यात आले आहे.