सोनी सबवरील मालिका ‘वागले की दुनिया – नयी पीढी, नये किस्से’ या वर्षाच्³ाा सुरूवातीला सुरू झाल्³ाापासून प्रेक्षकांनी भरपूर प्रेम देण्³ाासोबत मालिकेचे भरभरून कौतुक केले आहे. या मालिकेमध्³ाs अंजन श्रीवास्तव, भारती आचरेकर, सुमीत राघवन आणि परिवा प्रणती प्रमुख भूमिकेत आहेत. सोनी सब प्रस्तुत मूल्याधरित व हलकी-फुलकी मालिका आपल्³ाा दैनंदिन जीवनातील सार सादर करते.
मालिका जवळपास 100 एपिसोड्स पूर्ण करत असताना मालिकेकडे आकर्षिलेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मालिका, तिची पटकथा व मालिकेमधील पात्रांवर भरभरून प्रेम व कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यांनी मालिकेला ‘बेस्ट शो ऑन इंडियन टेलिव्हिजन टूडे’ म्हटले आहे.
मालिकेबाबत सांगताना सोशल मीडियावरील एक चाहता म्हणाला, ‘निश्चितच ‘वागले की दुनिया’ ही सध्याच्या काळातील भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वोत्तम मालिका आहे. सकारात्मकता, आनंदाने भरलेले, तसेच जीवनातील महत्त्वपूर्ण संस्कार देणारे साधे, लहान व प्रेमळ एपिसोड्स पाहताना असे वाटते की, आमच्या रोजच्या जीवनातील कथा पाहत आहोत. आणखी एक चाहता म्हणाला, ‘वागले की दुनिया ही आतापर्यंतची भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वोत्तम मालिका आहे’. जेडी सर आणि संपूर्ण टीमची उत्तम निर्मिती असलेली मालिका आहे. प्रत्येकाने ही मालिका पाहिलीच पाहिजे. मी खात्री देतो की, या मालिकेमधून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल.’
चाहत्यांनी केलेल्या कौतुकामुळे आनंदित झालेले अंजन श्रीवास्तव ऊर्फ सीनियर वागले म्हणाले, ‘प्रेक्षकांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहून खूपच चांगले वाटत आहे. कलाकार म्हणून आम्हाला आमच्या चाहत्यांच्या चेहऱयांवर हास्य व आनंद आणण्याचे आमचे प्रयत्न फळाला येताना तसेच आमचे लाडके चाहते आमच्याशी जुडले जात असल्याचे पाहून खूपच अभिमान वाटतो. सतत पाठिंबा देत असलेल्या माझ्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानतो आणि मला सांगावेसे वाटते की ‘वागले की दुनिया’ हा सुखद प्रवास नुकताच सुरू झाला आहे. आम्ही आणखी आनंददायी एपिसोड्ससह आमच्या प्रेक्षकांना आनंद देत राहू.
सुमीत राघवन म्हणाले, ‘प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम पाहून मी खूप भारावून गेलो आहे आणि काळासह मालिकेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाचा देखील मला आनंद होत आहे.’