पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगण्यातील प्रकार
पश्चिम बंगालमध्ये एक असा भाग आहे, जेथे 300 महिलांना वाघांमुळे वैधव्य प्राप्त झाले आहे. हा भाग सुंदरबनजीकचा दक्षिण 24 परगण्याचा आहे. सुंदरबनमध्ये मोठय़ा संख्येत वाघांचे वास्तव्य आहे. पण या जंगलात मध, मासे आणि खेकडे पकडण्यासाठी अनेकदा या भागातील लोक जात असतात. यातील बहुतांश जणांवर वाघ हल्ला करत असतो.
येथील सुमारे 3000 महिलांच्या पतींचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे विधान दक्षिणबांगा मत्सजीवी फोरमचे अध्यक्ष प्रदीप चटर्जी यांनी केले आहे. तर ग्रामस्थांनुसार मागील वर्षी एप्रिलपासुन आतापर्यंत सुमारे 60 जणांचा मृत्यू वाघांच्या हल्ल्यात झाला आहे.
या भागात मजुरीदाखल लोकांना 176 रुपये मिळतात. पण जंगलांमध्ये काम केल्यास त्यांना एका दिवसात 700 रुपयांपर्यंतची कमाई प्राप्त होते. यादरम्यान ते जंगलात प्रतिबंधित क्षेत्रात शिरतात आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकतात.
जंगलात सुमारे 60 हजार लोक काम करतात, पण अधिकृतपणे यातील केवळ एक तृतीयांश लोकांकडचे परवाना असतो. सुंदरबन व्याघ्र प्रकल्पाचे संचालक तपस दास यांच्यानुसार या भागात केवळ 21 अधिकृत मृत्यू झाले आहेत. यातील केवळ 4 प्रकरणे भरपाईस पात्र होती. सरकार प्रतिबंधित क्षेत्राबाहेर झालेल्या मृत्यूप्रकरणीच भरपाई देते.