प्रतिनिधी / लखनौ
आज पर्यंत मानवाच्या हव्यासाने पर्यावरण आणि प्राणीमात्रांची अपरिमीत हानी होताना आपण पाहत आहोत. पण उत्तर प्रदेश येथील पिलभीत व्याघ्रप्रकल्पादरम्यान ११ जुलै रोजी रात्री दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या तीघांवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला, तर एका व्यक्तीस आपले प्राण वाचवण्यास यश आले.
सविस्तर वृत्त असे की, या हल्ल्यास बळी पडलेले तीघे कंदाई पाल (२७), सोनू पाल (२२) आणि विकास (२३) हे आपल्या गावी परतताना व्याघ्रप्रकल्पाच्या देवरिया दरम्यान हा हल्ला झाला. प्रवासापुर्वी सुरक्षा रक्षकांनी या तीघांना सतर्क करत या परिसरात वाघीणीचा वावर असल्याची कल्पना देत. इतर मार्गाने प्रवास करण्याचा सल्ला दिला होता. पण याकडे दुर्लक्ष केल्याने थोडेच अंतर गेल्यावर वाघाने हल्ला केला. यात दोघांचा मृत्यू झाला, तर एकाने झाडावर चढत स्वत:चा जीव वाचवल्याचे स्पष्ट झाले आहे.
सकाळी वाटसरुंच्या हा प्रकार लक्षात आला,पोलीसांना याची माहिती दिली असता पोलीसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या आरोग्य केंद्रावर पाठवले असून ग्रामस्थांच्या मदतीने एकाला झाडावरुन खाली उतरत उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच हल्ला केलेला वाघ नेमका कोणता आहे. याचा शोध घेतला जात असून हल्ला झालेल्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा पिलभीतचे उप निर्देशकांनी दिला आहे.