वाळपई / प्रतिनिधी :
सत्तरी तालुक्मयातील गोळावली गावात चार वाघांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील देरोडे गावात एका वाघाने गाभण गायीचा बळी घेतल्यामुळे पुन्हा एकदा भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सदर भागात वाघाची दहशत निर्माण होण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत असून सध्यातरी म्हादई अभयारण्य वनखात्याची यंत्रणा सदर भागात संध्याकाळपर्यंत गांभीर्याने उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून व्यस्त होती.
गोळावलीत गेल्या आठ दिवसांपासून 5 वाघांच्या मृत्यूचे प्रकरण जागतिक स्तरावर गाजत आहे. यामुळे सदर ठिकाणी निश्चित वाघाच्या मृत्यूचे कारण काय व यामागे अटक करण्यात आलेल्या संशयिताने त्यांनी का ठार केले अशा प्रकारची माहिती समोर आल्यानंतर वनखाते त्याचप्रमाणे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने नियुक्त केलेले पथक वेगळय़ा माध्यमातून चौकशी करीत आहे.
वेगवेगळय़ा माध्यमातून धागेदोरे गोळा करून या संदर्भाची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करीत असताना शुक्रवारी रात्री देरोडे येथील लाडको जाधव यांच्या गायीवर वाघाने हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रकार झालेला आहे. त्यामुळे सत्तरीत खळबळ माजली असून म्हादई अभयारण्य व वनखात्याचे यंत्रणेसमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
लाडको जाधव यांनी नेहमीप्रमाणे आपली गुरे चरण्यासाठी सोडली होती. शुक्रवारी रात्री गाभण असलेली गाय गोठय़ात न परतल्यामुळे आज शनिवारी सकाळी तिचा शोध घेतल्यानंतर ती जवळच्या नदीपात्रात मृतावस्थेत सापडली. ती पूर्णपणे जखमी असल्याचे पहावयास मिळाले. प्रथमदर्शी अंदाजानुसार तिच्यावर वाघाने हल्ला केल्याचे स्पष्ट करण्यात आल्यानंतर यासंदर्भाची माहिती वनखात्याच्या यंत्रणेला देण्यात आली. यासंदर्भातील माहिती मिळताच वनखात्याचे यंत्रणेने घटनास्थळी धाव घेऊन यासंदर्भात पाहणी केली. सदर गायीवर मोठय़ा प्रमाणात वाघाने हल्ला केला असून तिला रक्तबंबाळ अवस्थेत पाण्यात सोडून दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. तिच्या सर्वांगावर मोठय़ा प्रमाणात जखमा निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले. यासंदर्भात पशु वैद्यकीय अधिकाऱयाने पंचनामा व उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर तिच्यावर वाघाने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे.