प्रतिनिधी/ बेळगाव
दरवषी प्रसिद्ध होणाऱया पुस्तकांतून निवडक पुस्तकांना वाङ्मय चर्चा मंडळातर्फे साहित्य पुरस्कार दिले जातात. 2019 सालासाठी साहित्य पुरस्कार पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत.
वाङ्मय चर्चा मंडळाचा साहित्य पुरस्कार समीक्षा-संशोधनासाठी डॉ. संगीता खुरद (नागपूर) यांच्या ‘पु. शि. रेगे’ या पुस्तकाला देण्यात आला आहे. कृ. ना. हुईलगोळ साहित्य पुरस्कार ललित लेखनासाठी डॉ. अनुपमा उजगरे (ठाणे) यांच्या ‘बिलोरी कवडसे’ या पुस्तकाला देण्यात आला आहे. वि. ना. मिसाळ साहित्य पुरस्कार कथासंग्रहासाठी नीलम माणगावे (जयसिंगपूर) यांच्या ‘किती सावरावा तोल’ या पुस्तकाला देण्यात आला आहे. कविवर्य कृ. ब. निकुम्ब साहित्य पुरस्कार काव्यसंग्रहासाठी संदीप शिवाजी जगदाळे (पैठण) यांच्या ‘असो आता चाड’ या पुस्तकाला देण्यात आला आहे. वाङ्मय चर्चा मंडळाचा विशेष साहित्य पुरस्कार कादंबरीसाठी डॉ. विनोद गायकवाड (बेळगाव) यांच्या ‘पृथ्वीपती’ या पुस्तकाला आणि बाळासाहेब लबडे (रत्नागिरी) यांच्या ‘पिपिलिका मुक्तीधाम’ या पुस्तकाला देण्यात आला आहे. स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व मानधनाचा चेक असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.
मार्च 2019 पासून चाललेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आला आहे. तरी विजेत्या लेखकांना घरपोच हे पुरस्कार कुरिअरने पाठविण्यात येतील, असे वाङ्मय चर्चा मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.