खानापूर / वार्ताहर
वाढदिवस हा अलीकडच्या काळातील एक पेझ बनला आहे. वृत्तपत्र, मोबाईल, फेसबुकच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी पसंती दिली आहे. वाढदिवस हा तसे पाहता आयुष्याच्या घटनेचा एक भाग असला तरी वाढदिवसाच्या माध्यमातून आपुलकीची माणसे एकमेकाच्या जवळ जोडली जातात. प्रत्येक व्यक्तीच्या कार्याची ओळख या माध्यमातून होते. त्यामुळे मानवता वादाला प्राधान्य मिळत असल्याचे विचार तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले. खानापूर येथील महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने त्यांचा वाढदिनी सत्कार करण्यात आला.
यावेळी खानापूर तालुका पत्रकार संघटना, लैला शुगर्स व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे येथील विश्रांमधमात खानापूर तालुका भाजपच्यावतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांचा गुरुवारी 58 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. विठ्ठल हलगेकर यांनी तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुपच्या माध्यमातून तालुक्मयाच्या सहकार क्षेत्रात मोठे जाळे विस्तारले आहे. शिवाय शैक्षणिक धर्मिक कार्यासह राजकारणातही आपले प्रस्थ राखले आहे. या त्यांच्या गरुड भरारी कार्याबद्दल त्यांना दिवसभर शुभेच्छा दिल्या. व संस्थेच्यावतीने त्यांचा वाढदिनी सत्कार करण्यात आला.
यावेळी महालक्ष्मी सोसायटीच्या खानापूर शाखेच्या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात लैला शुगर्सचे व्यवस्थापक सुब्बा राजू, उपाध्यक्ष एम. मुरली यासह तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुपचे उपाध्यक्ष संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत सचिव तुकाराम हुंदरे यांनी तर आभार शिक्षक नागेश जोगोजी यांनी मांडले. त्याप्रमाणे येथील विश्रांमधमात तालुका भाजपच्यावतीने त्यांचा वाढदिनी केक कापून सत्कार करण्यात आला. त्यावेळी विविध संस्थांच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.