प्रतिनिधी/ सातारा
ऑक्टोबर महिन्याच्या आरंभापासून जिल्हय़ात बाधित वाढीचा आलेख खालीच घसरता राहिला असून 11 ऑक्टोबर पासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत सलग सातव्या दिवशी देखील वाढीचा आलेख 100 च्या खाली राहिला आहे. अल्पवाढीतही थोडेसे चढउतार असून तीन तालुक्यात तीन अंकी वाढ तर पाच तालुक्यात एक अंकी वाढ समोर आली असून कोरेगाव व पाटण तालुके निरंक राहिल्याचा तर एकाही बाधिताचा मृत्यू नोंद नसल्याचा दिलासा शनिवारी रात्री आलेल्या अहवालाने दिला आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून इंडियन कोव्हिड पोर्टलवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री अहवालात 72 जणांचा अहवाल बाधित आला आहे. एकाही बाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नसून रविवारी सायंकाळी 342 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सातारा, कराड, फलटणमध्ये दोन अंकी वाढ
गेल्या काही दिवसांपासून जिल्हय़ातील कोरोना संसर्ग कमी होत आहे. मात्र, काही तालुक्यात थोडी वाढ समोर येत आहे तर काही तालुके निरंक रहात आहेत. सातारा, कराड, फलटण हे तीन तालुके चांगलेच सावरलेत, मात्र अद्यापही तिथे थोडी पण दोन अंकी संख्येने वाढ सुरु आहे. तर माणसह खटाव, वाई, महाबळेश्वर, जावली तालुका चांगले सावरले असून कोरेगाव पहिल्यांचा निरंक राहिला तर पाटण तालुका निरंक राहण्याची ही गत महिन्यापासून पाचवी वेळ आले. तर महाबळेश्वरही अनेकदा निरंक राहिलेले आहे.
90 जणांचा अहवाल बाधित
सोमवारी रात्रीच्या अहवालानुसार आजचे व आजअखेर बाधित झालेल्यांची तालुकानिहाय आकडेवारी अशी आहे. सातारा 22 (51,755), कराड 12 (39,119), फलटण 10 (37,276), माण 9 (17,894), खटाव 5 (25,785), महाबळेश्वर 4 (4,698), जावली 4 (10,0013),वाई 1 (15,730), खंडाळा 1 (14,167), कोरेगाव 0 (21,896), पाटण 0 (10,130), इतर 2 (2,147) असे एकूण 2,50,614 आजअखेर बाधित झालेल्याची संख्या आहे.
पहिला डोस घेणाऱयांची संख्या 19 लाखांवर
जिल्हय़ात रविवारी लसीकरणाचा वेग मंदावला होता. त्यामुळे सायंकाळपर्यंत 629 जणांचे लसीकरण झाल्याची माहिती कोविन पोर्टलवर होती. यामुळे जिल्हय़ात लस घेणाऱया नागरिकांची एकूण संख्या 27 लाख 13 हजार 464 एवढी दिलासादायक झालेली असून यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 19 लाख 9 हजार 063 एवढी असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 8 लाख 4 हजार 401 एवढी झालेली आहे.
कोरोनामुक्ती 2 लाख 42 हजारांच्या पार
गत दोन दिवसात कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या थोडी वाढली असून कोरोनामुक्तीचा आलेख थोडा वर चढला आहे. रविवारी सायंकाळी 342 जणांना घरी सोडण्यात आल्याने एकूण कोरोनामुक्तांची संख्या 2 लाख 42 हजारांच्या पार गेली आहे. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 2 लागा 42 हजार 255 वर असल्याचा मोठा दिलासाही जिल्हय़ाला लाभलेला आहे.