जिल्हय़ात 790 बाधित तर 32 बाधितांचा मृत्यू, कराड, सातारा तालुके हॉटस्पॉटच
प्रतिनिधी/ सातारा
लॉकडाऊन असताना देखील तीन अंकी संख्येने 800 च्या पटीत सुरु असलेली बाधित वाढ काही वेळा खाली घसरली होती. लॉकडाऊन शिथील केल्यानंतर हा तीन अंकी वाढीचा रतीब सुरुच असून मृत्यूदर घटत नसल्याने तो रोखण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे आहेच. गेल्या काही दिवसांपासून कराड व सातारा तालुक्यात तीन अंकी संख्येने रुग्ण वाढ सुरु असून इतर आठ तालुके दोन अंकी संख्येवर आले तर महाबळेश्वरात एक अंकी संख्येने वाढ सुरुच आहे. कोरोनामुक्तीचा वेग मंदावल्याने आजमितीस ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 11 हजार 75 एवढी आहे. कोरोना रोखताना सर्वांचे जगणे सुसहय़ करुन संकटावर मात करण्यासाठी आता प्रशासनाची जबाबदारी वाढलीय.
दरम्यान, जिह्यात शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 790 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 32 बाधितांचा मृत्यू झाला. तर रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे फक्त अल्प 120 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिलीय.
कराड, साताऱयावर हॉटस्पॉटचा शिक्का कायम
कोरोना संसर्गामध्ये पहिल्यांदा कराड व नंतर सातारा आणि दोन्ही तालुके हॉटस्पॉट ठरले आहेत. या दोन्ही तालुक्यांतील वाढ थांबवण्यासाठी उपाय योजना राबवण्याची आवश्यकता आहे. तर नंतर हॉटस्पॉट ठरलेले खटाव, माण, फलटण, कोरेगाव, खंडाळा, वाई, जावली हे दोन अंकी संख्येवर आले तर महाबळेश्वरातील वेग दिलासादायकरित्या मंदावला असला तरी तिथे एक अंकी संख्येने वाढ सुरु आहे. तर बळींचा आकडा 30 संख्येवर स्थिर असून अधूनमधून मृत्यूदराचा आलेख खाली वर होत असला तरी थांबलेला नाही.
शनिवारी अहवालात 790 बाधित
शनिवारी अहवालानुसार तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. कराड 243 (28,885), सातारा 160 (41,112), कोरेगांव 88 (17,118), फलटण 67 (28,665), जावली 43 (8700), पाटण 41 (8699), खंडाळा 34 (11,974), खटाव 38 (19,871), वाई 33 (12,840), माण 27 (13,307), महाबळेश्वर 6 (4,306), व इतर 10 (1,380) असे आज अखेर एकूण 1,96,857 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
बाधितांचे मृत्यू वाढू लागले
शनिवारी अहवालानुसार आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. कराड 7 (846), जावली 1 (197), खंडाळा 0 (152), खटाव 2 (498), कोरेगांव 5 (389), माण 1 (264), महाबळेश्वर 0 (45), पाटण 2 (205), फलटण 4 (287), सातारा 6 (1259), वाई 4 (340) असे आज अखेर जिह्यामध्ये एकूण 4482 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुक्ती 1 लाख 83 हजारांनजिक
गेल्या काही दिवसात वाढलेला कोरोनामुक्तीचा वेगही गेल्या चार ते पाच दिवसात मंदावला आहे. रविवारी तर तो अत्यंत अल्प असतो. रविवारी अल्प आल्यावर तो सोमवारी दुप्पट, चौपट असतो हे सुट्टीमुळे घडते की काय? पण ते घडतच आहे. रविवारी फक्त 120 जणांना घरी सोडण्यात आल्याने एकूण कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 82 हजार 677 एवढी झाली असून ती 1 लाख 83 हजारांच्यानजिक आहे. एकूण रुग्ण संख्येचा आकडा दोन लाखाकडे जावू लागला आहे.