मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव तालुका परिसरात वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पहिलाच कोरोनामुळे भयभीत झालेल्या नागरिकांना आता बदलत्या वातावरणाचा फटकाही सहन करावा लागत आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी जोराचा तर काही ठिकाणी पावसाचा शिडकावा पडला आहे. त्यामुळे हे वातावरण कधी स्वच्छ होणार याकडेच साऱयांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
मध्यंतरी बदलत्या वातावरणामुळे भर दुपारी उष्म्यात वाढ होत असतानाच संध्याकाळी थंडी पडत होती. तर मागील काही दिवसांपूर्वी थंडीने जोर धरला होता. बेळगावचा पारा कमी होत असतानाच ढगाळवातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सर्वसामान्यांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. या वातावरणामुळे मात्र सर्वसामान्यांना याचा फटका बसत आहे. या वातावरणामुळे मात्र रात्रीच्या थंडी कमी झाली आहे.
आता मागील तीन ते चार दिवसांपासून रात्रीही उष्म्यात वाढ झाली आहे. याचा परिणाम मात्र सर्वसामान्यांना जाणवू लागला आहे. या वातावरणामुळे अनेकांना दवाखान्याची पायरी चढावी लागत आहे. त्यातच कोरोना सारख्या महामारीमुळे अनेकांतून भिती व्यक्त करण्यात येत आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सध्या शेतात भाजी व इतर कडधान्य पिके आहेत. जर जोराचा पाऊस झाला तर या पिकांना फटका बसण्याची शक्मयता नाकारता येत नाही.
नैसर्गिक वातावरणाचा फटका सर्वसामान्यांनाच बसला आहे. शिवरात्र झाली की उष्म्यात मोठय़ा प्रमाणात वाढ होवून अनेकांना उन्हाची लाहीलाही वाटते. मात्र आता शिवरात्री पूर्वी ढगाळ वातावरण व या बदलत्या हवामानामुळे अनेक जण भिती व्यक्त करु लागले आहेत. शुक्रवारी काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला आहे. तर मागील दोन ते चार दिवसांत अनेक ठिकाणी जोराचा पाऊसही झाला आहे. त्यामुळे वातावरण कधी एकदा स्वच्छ होणार याकडे साऱयांच्या नजरा लागून आहेत.