प्रतिनिधी /बेळगाव
मंगळवारी सायंकाळी वादळी पावसाने सुमारे पाच तास संततधार पाऊस झाला. त्यामुळे मजगाव परिसरातील शेतवडीतील कापणी करून ठेवलेले संपूर्ण भात पाण्याखाली गेल्याने शेतकऱयांचे अतोनात नुकसान झाले आहे.
मोठय़ा अपेक्षेने रब्बी हंगामातील कडधान्य पेरणीही काही शेतकऱयांनी केली होती. अनेक शेतकऱयांनी बासमती, हंगाम गेल्याने इंद्रायणी व इतर भात पिके कापून ठेवली होती. मात्र अचानक आलेल्या वादळी पावसात शेतवडीतील भात पिकात पाणी साचले आहे. मसूर, हरभरा, गहू, वाटाणा ही रब्बी पिके पाणी साचून राहिल्याने कुजून जाणार असल्याने परिसरातील शेतकऱयांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
संबंधित अधिकाऱयांनी येथील विभागातील पिकांची पाहणी करून शासनामार्फत नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे.