25 लाखाचे नुकसान, महसूल अधिकाऱयांची घटनास्थळी भेट
वार्ताहर / औंध
काल झालेल्या वादळी वायासह धुव्वाधार पावसामुळे घाटमाथ्यावरील वर्धन अँग्रो कारखान्याचे जाँगरी पावडर साठवण करण्यासाठी उभारलेले गोडावून भुईसपाट होऊन अंदाजे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की औंधसह परीसरात सलग तीन दिवस उन्हाळी पावसाने झोडपून काढले आहे. काल दुपारीवादळी वायासह जोरदार पावसाने घाटमाथा येथील वर्धन अँग्रो साखर कारखान्यावर साखर आणि जाँगरी पावडर साठवणूक करण्यासाठी बांबू आणि टारपोलीन कागदापासून अंदाजे 60 बाय 250 फुट लांबीचे दक्षिण उत्तर गोडावून तयार करण्यात आले आहे. सोसाटय़ाचा वारा आणि धुव्वाधार पावसाने गोडावून अक्षरशः भुईसपाट झाले. टारपोलीनचा छत फाटून आतील जाँगरी पावडर आणि इतर साहित्याचे अंदाजे 25 लाखाचे नुकसान झाले आहे. आज घटनास्थळी महसूल अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.