नदीपात्र अंतर्गतच्या पाण्यामुळे जमिनीची धूप
वार्ताहर / दोडामार्ग:
गेल्या दोन वर्षात तिलारी खोऱयात पडलेल्या मुसळधार पावसाने बहुतांशी गावातील तिलारी नदीपात्र अंतर्गतच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी जमिनींची धूप झाली आहे. त्या ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्याची मागणी करण्यात आल्याचा पार्श्वभूमीवर तिलारी प्रकल्प प्रशासनाच्या अधिकाऱयांनी वायंगणतड येथे पाहणी केली. सदर बंधारे बांधण्यासंदर्भात आवश्यक ती सर्व कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन दिले. जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुरेश दळवी व सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षात जिह्यात तसेच विशेषत: दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसात तिलारी खोऱयातील अनेक शेतकऱयांना त्याचा फटका बसला. अनेक ठिकाणी नदी पात्र वाढल्याने जमिनीची धूप होऊन शेतजमिनींनाही धोका निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर संबधित ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्याची मागणी होत होती. जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुरेश दळवी, सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो यांनी देखील तिलारी पाटबंधारे प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर तिलारी प्रकल्प प्रशासनाचे अधिकारी आजगेकर यांनी वायंगणतड व अनेक ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित गावातील ग्रामपंचायतींनी देखील अशा नुकसानीची माहिती ठरावाच्या रुपाने तिलारी पाटबंधारे प्रकल्प प्रशासनापर्यंत पोहचावी. आमच्या प्रशासनातर्फे या संदर्भातील महत्वपूर्ण प्रस्ताव जलसंपदा विभागापर्यंत पाठविण्यात येईल असे आजगेकर यांनी सांगितले. दरम्यान, तिलारी पाटबंधारे प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचा पर्यायाने तिलारी खोऱयाचा महत्वाचा वाटा असूनही अद्यापपर्यंत बहुतांशी गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्याची तिलारी प्रकल्प प्रशासनाने गांभीर्याने दाखल घेणे गरजेचे आहे, याकडेही लोबो यांनी लक्ष वेधले. जलसंपदा मंत्र्यांकडे यासंर्भात आपण पाठपुरावा करणार असल्याचे सुरेश दळवी यांनी सांगितले. दरम्यान, तिलारी खोऱयातील बऱयाच नद्यांमध्ये साचलेला गाळ काढून त्या योग्य पद्धतीने प्रवाहित करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय येत्या 15 जानेवारीपासून केले जातील, असेही आजगेकर यांनी सांगितले. यावेळी शेतकरी आबा दळवी, पंकज देसाई उपस्थित होते. tamp