250 एकर क्षेत्रात एकाचवेळी शेतीला सुरूवात,
शेकडो हात राबू लागले शेतमळय़ात : गावातील प्रत्येक कुटुंबाचा सहभाग, बच्चे कंपनीनेही घेतला भातशेती लागवडीचा आनंद
परेश सावंत / आचरा:
पावसाळी हंगामात वेगवगळय़ा नैसर्गिक आपत्तींचा सामना करून पुरता मोडून गेलेला शेतकरी आज मात्र, नव्या उमेदीने नव्या जोशात हाती नांगर घेऊन बैलजोडीसह शेतात उतरला हे दृश्य होते ते मालवण तालुक्यातील वायंगणी गावच्या देवमळय़ातील. तब्बल 300 वर्षांची परंपरा असलेल्या मालवण तालुक्यातील वायंगणी येथील सुमारे 250 एकर क्षेत्रात पसरलेल्या विस्तीर्ण अशा देवमळय़ात सामुदायिक शेतेला शुभ मुहुर्तावर सुरूवात होऊन वायंगणी गावच्या विस्तीर्ण शेतमळय़ातील नांगरणीनंतर भाताच्या लावणीला सुरूवात झाली आहे. गावातील शेकडो हात देवाच्या हुकुमाने मळय़ात राबू लागले आहेत. शेकडो वर्षांपूर्वी सुरू झालेली सामुदायिक शेतीची संकल्पना वायंगणी गावात आजही राबवली जात आहे. देवाचा कौल घेउढन एकाच वेळी संपूर्ण गाव बैलजोडय़ा घेउढन या देवमळय़ात उतरला होता. शनिवारी प्रत्यक्षात भात लावणीस सुरूवात झाली आहे. शेतीसाठी लागणारे पाण्याचे व्यस्थापन यावेळी पाहण्याजोगे होते.
जोश, उत्साहात भातशेतीला झाली सुरूवात
पावसाळी हंगामात अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱयांचे भातशेतीसह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले. मात्र वायंगणीच्या देवमळय़ात दुबार पीक घेण्याची पद्धत असल्याने वायंगणी गावातील प्रत्येक शेतकरी मागचे दु:ख, झालेले नुकसान विसरुन देवाच्या हुकुमाने आशीर्वचनाने आज सुरू झालेल्या भातलागवडीतून 100 टक्के उत्पन्न मिळणार या खात्रीने अगदी जोश, उत्साहात वायंगणीतील शेतकरी कुटुंबे देवशेतीत कामाला लागले हेते. कमालीच्या एकोप्याने आणि श्रद्धेने दुबार शेतीला प्रारंभ झाला होता. एकीकडे कोकणात दिवसेंदिवस पडीक शेती जमिनींचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे याच कोकणातील वायंगणीसारखे गाव पिढय़ांपिढय़ा शेतीसाठी एकत्र येत कोणतेही वाद, तंटे न करता सुमारे अडीचशे एकर पसरलेल्या या देवमळय़ात शेती करतात. आणि तेही वर्षांतून दोनवेळा. नियोजित सी-वर्ल्ड प्रकल्पाच्या माध्यमातून संपून देशभर चर्चेत आलेल्या या गावातील ही ऐतिहासिक परंपरा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. एकाच वेळी चिखल उडवत चालणारी बैलांची जोते, एकाचवेळी लावणीसाठी मळय़ात उतरणाऱया गावातील महिला हे दृश्य आणखीन कुठेही पहायला मिळत नाही. वर्षांतून दोनवेळा या देवमळय़ावर बळींराजाची ही अनोखी जत्रा सुरू झाली आहे.
शेतीतील पाणीव्यवस्था वाखाणण्याजोगी
ग्रामदेवतेच्या कृपाशीर्वादाने गेली 300 वर्षे अखंडीपणे सुरू असलेल्या या शेतीमध्ये अनेक प्रथा, परंपरा व वैशिष्टय़े लपलेली आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अडीचशे एकराचे हे भलेमोठे शेतीक्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी पाण्याचे जे पाट तयार करण्यात आले आहेत. त्यांचे तंत्रज्ञान व नियोजन हे आधुनिक तंत्र ज्ञानालाही लाजवणारे आहे. या सिंचन पद्धतीतील पाटांची अशी रचना केली आहे, की या भल्यामोठय़ा क्षेत्रातील कुठल्याही कुणग्याला भिजवण्यासाठी शेतपंपाची आवश्यकता भासत नाही. या शेतीमधून जाणारा बारमाही पाण्याचा पाट हे ग्रामदेवतेने या गावाला दिलेले वरदान समजले जाते. दरवर्षी शेतकरी या मळय़ात बांधबंधिस्ती करतो.
सेंद्रीय खताचा वापर
शेती म्हटली की रासायनिक खते असे सध्याचे समीकरण झाले आहे. मात्र, याला वायंगणी गावातील शेतकऱयांनी बगल दिली आहे. आज वायंगणी गावातील शेतकरी गोबर, शेणखताचा वापर करताना दिसत होता. यावेळी अभिमानाने सांगताना शेतकरी म्हणाले, आमच्याकडे ग्रामदेवतेच्या कृपाआशीर्वाद आहे म्हणूनच आम्ही व आमचा गाव संपन्न तर आहे. आमच्या शेतीचे शेतीचे किटकांपासून, जनावरांपासून, पाखरांपासून व नैसर्गिक आपत्तीपासून कधी नुकसान होत नाही म्हणूनच आम्ही पारंपरिक शेतीची कास न सोडता, रासायनिकतेकडे न वळता आजपर्यंत भरधोस उत्पन्न देणारी शेती करीत आहोत.
बच्चे कंपनीने घेतला शेतीमध्ये सहभाग
वायंगणी गावातील देवशेतीतील भात लागवडीला कणकवली येथील युरेका लायन्स कल्बच्या माध्यमातून काही बच्चेकंपनीने भेट देत शेतकऱयांबरोबर मळय़ात सहभागी होत भातशेती लागवडीचा आनंद घेतला. नेहमीच शहरात असणारी ही बच्चेकंपनी देहभान हरपून या ढोपरभर चिखलात, मोठय़ा पाण्याच्या पाटामध्ये अगदी हरवून गेलेली दिसत होती. काही बच्चे कंपनीने तर शेतीत फिरवलेल्या शेतपाटात उडय़ा मारत पाण्यात मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेत होती. आपल्या डब्यातून आणलेला खाऊही शेतमळय़ात बसून एकमेकांना शेअर करीत वनभोजनासारखा आनंदही या बच्चेकंपनीने यावेळी घेतला.