वारणानगर / प्रतिनिधी
येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील २०० रू. चा दुसरा हप्ता देणेसाठी स्वाभिमाणी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखाना प्रशासनाला निवेदन दिले.
चालू गळीत हंगाम सुरू होऊन चार महिने होत आले आहेत कारखाना कार्यक्षेत्रातील अनेक गावातील ऊस संपत आलेला आहे . स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जयसिंगपूर येथे घेण्यात आलेल्या २० व्या ऊस परिषदेमध्ये एफआरपी अधिक २०० रूपये अशी प्रतिटन पहिल्या उचलीची मागणी केली होती.पहिल्यांदा विनाकपात एफआरपी तर उरलेले २०० रूपये जानेवारी महिना अखेर द्यायचे , अशी मागणी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती या अनुषंगाने दुसऱ्या हप्त्याची मागणी संघटनेने केली आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी महापुराच्या कवेत सापडून उद्ध्वस्त झालेले आहेत. यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे शासनाने नुकसान भरपाई देताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठेंगा दाखवलेला आहे. सध्या बाजारपेठेत साखरेला भाव आहे . तसेच आगामी काळात देखील साखरेला चांगला दर आहे . शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णत : कोलमोडली आहे . खताचे दर दुप्पट झाले आहेत . डिझेलचे भाव वाढलेले आहेत . शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे . त्यामुळे उसाचा दुसरा हप्ता २०० रूपये प्रतिटन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावेत, अन्यथा साखर कारखान्याविरूध्द स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बतीने जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
स्वाभिमाणीचे पन्हाळा तालुका अध्यक्ष अजित पाटील, अशोक पाटील, हरीश पाटील, बाजीराव पाटील, विजय सावंत,धनाजी पाटील, शिवाजी आंबेकर, राहुल पाटील,शंकर पाटील, आण्णा मगदूम, निवास पाटील, माणिक निकम, दीपक पाटील, दीपक सनदे, सुधीर मगदूम,मनू देसाई, हनुमंत हवलदार,पंडित राबाडे, सुनील सूर्यवंशी,बबन पाटील,विजय पाटील, सतीश परीट संजय माळी नंदकुमार पाटील इत्यादी स्वाभिमानीचे कार्यकर्ते यानी दिलेले निवेदन कारखान्याचे सेक्रेटरी बी.बी. दोशिंगे यानी स्वीकारून सदर निवेदन संचालक मंडळापुढे सादर करण्याचे आश्वासन दिले.