जिल्हा परिषदेतील मृत कर्मचाऱयांचे वारसदार , एका वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनामुळे जिल्हा परिषदेतील मृत कर्मचाऱयांच्या वारसदारांना नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे. या वारसदरांना एक वर्षाच्या आत नोकरीसाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यानंतर अनुकंपा तत्त्वातून त्यांना नोकरी मिळणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी दिली.
जाधव म्हणाले, कोरोनामुळे जिल्हा परिषदेत विविध विभागात कार्यरत असणाऱया 24 कर्मचाऱयांचा मृत्यू झाला आहे. त्यामधील 5 कर्मचाऱयांना 50 लाखाचा विमा मिळाला आहे. उर्वरित प्रस्ताव राज्य शासनास पाठविले आहेत. मृत कर्मचाऱयांच्या वारसांना नोकरी देण्यासाठी राज्य शासनाने योजना लागू केली आहे. यामध्ये कोरोनात मृत्यू झालेल्या कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांनी अनुकंपावरील नियुक्तीच्या योजनेची माहिती, पात्र नातेवाईक, अर्ज करण्याची मुदत, शैक्षणिक आर्हता, टंकलेखन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या वारसदारांना एका वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. त्यामध्येही कुटुंब निवृत्ती वेतनधारकांला पुटुंब निवृत्ती वेतनविषयक कागदपत्रांची पुर्तता करताना लेखी कळविणे संबंधित आस्थापना अधिकाऱयाला बंधनकारक आहे. दरम्यान, जोपर्यंत अनुकंपा नियुक्तीकरिता आवश्यक कागदपत्रे उमेदवारांकडून प्राप्त होत नाहीत. तोपर्यंत वारसदरांचे नाव समाविष्ट करता येत नाही. अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी कागदपत्रांची पूर्तता करताना बराच कलावधी जात असून, वारसांनी कागदपत्रांची जुळणी करताना दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.