नंदगड / वार्ताहर
गेल्या दोन दिवसांपासून खानापूर तालुक्मयात ढगाळ वातावरण व सायंकाळी पाऊस पडत आहे. सध्या भात पिके तरारून आली असून ती कापणीच्या हंगामात आहेत. उसाची वाढ बऱयापैकी झाली आहे. पाऊस मात्र सातत्याने पडत असल्याने तरारून आलेली भात पिके जमीनदोस्त झाली आहेत. शिवाय उभे ऊस पीक जमीनदोस्त होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आता काही दिवस पावसाने उसंत घेण्याची गरज आहे.
नंदगडसह खानापूर तालुक्मयात सुमारे 36 हजार हेक्टर जमिनीत भाताचे उत्पादन घेतले जाते. मलप्रभा नदीकाठावरील शिवारात व खानापूर तालुक्मयाच्या पूर्व भागात उसाचे उत्पादन बऱयापैकी घेतले जाते. भात पीक तालुक्मयातील प्रमुख पीक म्हणून ओळखले जाते. तालुक्मयातील नंदगड, बिडी, हलशी, हलगा, कापोली, लोंढा, गुंजी, शिरोली, नेरसा, रामगुरवाडी, बरगाव, गर्लगुंजी, चापगाव, लालवाडी, बेकवाड, इटगी, गोधोळी, भुरुणकी, पारिश्वाड, गंदिगवाड, लोंढा, कक्केरी, जांबोटी, कणकुंबी, हेम्माडगा, कणकुंबी, शिरोली भागात भातपीक घेण्यात येते.
भात व ऊस पिकाला जेवढा अत्यावश्यक होता तेवढा पाऊस झाला आहे. परिणामी पिकाची जोमाने वाढ झाली. सध्या कमी पाण्याच्या जमिनीतील म्हणजेच माळरानावरील भात पिके कापणीला आली आहेत. काही ठिकाणी भात पिवळे होत आहे. अवघ्या महिन्याभरात उसाचीही तोडणी करावी लागणार आहे.
पानथळ जमिनीतील भात पिके पूर्णपणे पोसवली असून ती पिवळी झाली आहेत. भात तरारून आले आहे. परंतु गेल्या दोन दिवसांपासून वाऱयासह पाऊस पडत आहे. परिणामी आता हातातोंडाला आलेले भात व ऊस पीक जमीनदोस्त होऊन उत्पादनात मोठी घट होणार आहे.