नगरगाव, सावर्डे नागरिकांवरील अपघाताचा धोका टळणार
वाळपई / प्रतिनिधी
वाळपई कदंब बसस्थानाकावर जाण्यासाठी समांतर रस्त्याच्या पुलाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे सदर ठिकाणी असलेल्या अरुंद पुलामुळे निर्माण होणारी अपघाताची शक्मयता कमी होणार असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याप्रमाणे नगरगाव आदी भागामध्ये प्रवास करणाऱया प्रवासी वर्गासाठी हीच सुखदायक बाब ठरणार आहे.
याबाबतची माहिती अशी की वाळपई येथील कदंब बसस्थानकाचे काम करत असतानाच त्याठिकाणी जाण्यासाठी असलेला रस्ता पूर्णपणे अरुंद असून यामुळे मोठय़ा प्रमाणात धोका निर्माण होण्याची शक्मयता असल्याचे ओळखून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या जागी समांतर पुलाच्या उभारण्याची घोषणा केली होती. मात्र गेल्या काही वर्षापासून सदर पुलाचे काम पूर्णपणे रखडले होते. जवळपास दीड वर्षापूर्वी या फुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. सदर कामाला प्रारंभ करण्यात आल्यानंतर सध्यातरी हे काम अंतिम टप्प्यात असून येणाऱया काळात म्हणजे जवळपास पावसाळय़ापूर्वी सदर समांतर पुल वापरात येणार आहे.
सदर अरुंद पुलावरून सावर्डे नगरगाव आदी भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाहनांची संख्या येजा करीत असते. हा पूल पूर्णपणे अरुंद असल्यामुळे वाहतुकीला मोठय़ा प्रमाणात धोका निर्माण होत होता. त्याचप्रमाणे अनेकवेळा दुचाकी चारचाकी वाहनांना अपघाताच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते. आता या समांतर पुलामुळे अपघाताचा धोका पूर्णपणे टळला जाणार असून ये जा करणाऱया वाहनचालकांना सुखरूपपणे या पुलावरून वाहतूक करता येणार आहे. या पुलाचा वापर अमलात आल्यानंतर कदंबा बस स्थानकाचा वापर पूर्ण क्षमतेने करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सध्यातरी सदर कदंबा बस स्थानकावर अवघ्याच बसच्या माध्यमातून नागरिकांची वर्दळ सुरू असते. त्याचप्रमाणे याठिकाणी असलेले अनेक गाळे रिकामे पडले असून यामुळे सरकारला मोठय़ा प्रमाणात महसुलाला मुकावे लागले आहे. कदंबा बसस्थानकावर असलेला सभाग्रह यामुळे काही प्रमाणात महसूल प्राप्त होताना दिसत आहे .मात्र ज्या पद्धतीने वाहनांची वर्दळ याठिकाणी हवी होती तशी दिसत नसल्याने महसुलावर मोठय़ा प्रमाणात पाणी सोडावे लागले आहे. समांतर पुला संदर्भात वाळपई सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर काम अंतिम टप्प्यात आले असून पावसाळय़ापूर्वी या पुलाचा वापर होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येतील अशा प्रकारचे माहिती दिली आहे. यापुढे यामुळे मोठय़ा प्रमाणात नागरिकांना चांगल्या प्रकारची सुविधा प्राप्त होणार असून महत्त्वाचे म्हणजे अपघातांचा धोका पुण्यापर्यंत टळला जाणार आहे.
वाळपई नगरपालिकेचे नगराध्यक्ष अख्तर शहा यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना या पुलामुळे मोठय़ा प्रमाणात नागरिकांना चांगल्या प्रकारची सुविधा प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट केले आहे .स्थानिक आमदार गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांच्या प्रयत्नातून यापुलाच्या बांधकामाला चांगल्याप्रकारे सहकार्य मिळाले आहे. अरुंद स्वरूपाच्या जुन्या पुलामुळे नागरिकांना अपघाताचा मोठय़ा प्रमाणात धोका निर्माण होत होता. आता या नवीन समांतर पुलामुळे वनवे पार्किंग होणार असल्यामुळे बिनधास्तपणे वाहतूक करता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.