भारत-पाक सीमेवरील गावाची स्थिती
वाळवंटात 100 वर्षे जुन्या बेरिया
राजस्थानच्या बाडमेर जिल्हय़ात भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या वाळवंटी भागात एक गाव असे देखील आहे, जेथे लोक आजही वाळवंटात पूर्वजांनी तयार केलेल्या बेरिया किंवा खड्डय़ांमधून प्राप्त होणाऱया थेंब-थेंब पाण्यावर अवलंबून आहेत. स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही आतापर्यंत शासकीय मदतीने पाण्याच्या पुरवठय़ाचे स्वप्न अपूर्ण आहे.
सुमारे 2 हजार लोकसंख्या असलेल्या सरगीला गावातील लोक वाळूच्या टेकडय़ांमध्ये खणलेल्या बेरियांमधून टपकणारे पाणी जमा करतात आणि याच पाण्यावर वर्षांपासून जिवंत आहेत.
सूर्योदयासह सुमारे 100 वर्षे जुन्या या बेरियांवर पाणी मिळविण्यासाठी महिला आणि मुलांची गर्दी होते. अलिकडच्या काळात येथे पाण्यासाठीही रांग लागते. अशा स्थितीत महिला, मुले, वृद्ध सर्वजण बेरियांवर पाण्यासाठी स्वतःचा क्रमांक लागण्याची प्रतीक्षा करतात. या गावात अशा 10 हून अधिक बेरिया असून यातील 3-4 बेरियांमधूनच पाणी येते. उर्वरित बेरिया कोरडय़ा पडल्या आहेत.
30-35 फूट खोलीवर गोडे पाणी
-सरगीला गावात सध्या 10 हून अधिक बेरिया आहेत, यातील केवळ 3-4 मध्येच पाणी -सुमारे 30-35 फुटांच्या खोलीपर्यंत बेरिया खोदल्यास त्यात गोडे पाणी मिळाले होते. -यात थेंब-थेंब पाणी टपकत असते, जे एकत्र केले जाते.