प्रतिनिधी / वास्को
दाबोळी विमानतळ व शांतीनगर दरम्यानच्या महामार्गावर झालेल्या अपघातात चार वाहनांची हानी झाली. पावसाने भिजलेल्या रस्त्यावर धावती कार घसरल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी वास्को पोलिसांनी सदर कारचालकाविरूध्द निष्काळजीपणाचा गुन्हा नोंद केला आहे.
ही घटना सोमवारी दुपारी घडली. दाबोळी विमानतळासमोरून मांगोरहिलच्या दिशेने येणारी कार शांतीनगर येथील रस्त्यावर घसरून आडवी झाली. त्यामुळे त्या महामार्गाच्या बाजुला पार्क केलेल्या तीन गाडय़ांना या घसरलेल्या गाडीचा धक्का बसला. त्यामुळे एकाच अपघातात चार वाहनांचे नुकसान झाले. वास्को पोलीस या अपघात प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.