प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांचे प्रतिपादन : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी आयोजित 20 वे मराठी बालसाहित्य संमेलन उत्साहात
प्रतिनिधी / बेळगाव
लहान वयात श्रवण केलेल्या गोष्टी दीर्घकाळासाठी टिकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बालवयात साहित्याची ओळख करून देणे गरजेचे आहे. स्वतःमध्ये चांगले काय आहे, हे ओळखून स्वतःला व्यक्त करा, नटसम्राट नाटकातील आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका आपल्याला बरेच काही शिकवून जाते. स्वतःला लिहितं वाचतं करा व सृजनशील साहित्य निर्माण करा, विद्यार्थ्यांनी आभासी जीवन जगण्यापेक्षा वास्तववादी जीवनाचा स्वीकार करावा, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण हलकर्णी कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले.
गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी आयोजित 20 व्या मराठी बालसाहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिन व मराठी भाषा दिनानिमित्त आयोजिलेले हे संमेलन कॅम्प येथील गोगटे रंगमंदिरमध्ये उत्साहात पार पडले. व्यासपीठावर उद्घाटक डॉ. केदार सामजी, शंकरराव पाटील, अध्यक्ष जयंत नार्वेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, चिटणीस सुभाष ओऊळकर, विद्यार्थी प्रतिनिधी मयुरी शहापूरकर आदी उपस्थित होते. प्रारंभी मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी अभिमान गीत सादर केले. अध्यक्ष जयंत नार्वेकर यांनी स्वागत केले. जयदीप बिर्जे याने प्रास्ताविक केले. सायली तुपारे हिने परिचय करून दिला. मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राज्यात मराठी विभागात द्वितीय आलेल्या मयुरी शहापूरकर हिचा गौरव केला. यावेळी उद्घाटक डॉ. केदार सामजी यांनी मनोगत व्यक्त केले.
बालकथाकारांनी उपस्थितांची मिळविली वाहव्वा
संमेलनातील पहिल्या सत्रात बालकथाकारांनी एकापेक्षा एक सुंदर कथा सादर करून उपस्थितांची वाहव्वा मिळविली. यावेळी प्रियांका पवार हिने ‘अंबोळीचे शेत’ या कथेतून शेताकडे अंबोळय़ा घेऊन जाणाऱया महिलेची कथा सादर केली. साक्षी पाटील हिने ‘आकाराम’ या कथेतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे दर्शन घडविले. अथर्व गुरव याने ‘आई’ या कथेतून माय-लेकांचा जिक्हाळा काय असतो हे दाखवून दिले. समृद्धी पाटील हिने ‘कोरोना लग्न’ या कथेतून लॉकडाऊनमध्ये लग्न सोहळय़ावर अनेक अडचणी आल्या. त्यामुळे अनेकांचे हाल कसे झाले हे दाखवून दिले. या सत्राचे सूत्रसंचालन सुरेश भातकांडे यांनी केले.
काव्यगायनाने संमेलनात रंगत
दुसऱया सत्रात कवी कृ. ब. निकुंब यांच्या निवडक कवितांच्या काव्य गायनाचा कार्यक्रम झाला. मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थिनींनी सहभागी होत उत्तम गायन केले. यावेळी ‘खरं सांगू आई तुझं बाळ वेडंच दिसतं, रोज एवढय़ा सकाळी का गं उठून बसतं, चला जावू साऱयाजणी दूर पाखरांच्या रानी, ऐकू गाऊ मंजूळ पाखरांची गाणी’, ‘घाल घाल पिंगा वाऱया माझ्या परसात, माहेरीच्या सुवासाची कर बरसात’, या कवितांचे काव्यगायन करून संमेलनात रंगत आणली. सूत्रसंचालन बी. बी. शिंदे यांनी केले.
कवितांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद
तिसऱया सत्रात कवी संमेलन झाले. यावेळी सानिका पाटील हिने ‘हे काही बरे नाही झाले’, या कवितेतून लॉकडाऊनमध्ये कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले हे दाखवून दिले. रचना पावले हिने ‘प्लास्टिक बंदी’ या कवितेतून प्लास्टिकमुळे प्रदूषण वाढत असून ते हानीकारक आहे, हे सांगितले. निखिल कोतेकर याने ‘बाप नावाचं झाड’ या कवितेतून बापाची व्यथा मांडली. वेदिका खन्नुरकर हिने ‘पंढरीची वारी’ या कवितेतून कोरोनामुळे पंढरीची आषाढी, कार्तिक वारी चुकल्याची खंत व्यक्त केली. सौजन्या जत्राटी हिने ‘ज्ञानाची फुले’ या कवितेतून फुले दाम्पत्यांनी शिक्षणासाठी घेतलेल्या हालअपेष्टा दाखवून दिल्या. साक्षी भागुले हिने ‘कोरोना’ कवितेतून एका देशाच्या चुकीमुळे संपूर्ण जगाला कोरोनाची समस्या कशी उद्भवली याची प्रचिती आणून दिली. सायली तुपारे हिने ‘शहीद जवान’ कवितेतून सीमेवर दिवस-रात्र पहारा देणाऱया जवानांप्रती खंत व्यक्त केली. या सत्राचे सूत्रसंचालन सी. वाय. पाटील यांनी केले.
यावेळी समृद्धी पाटील, साक्षी पाटील, प्रियांका पवार, अथर्व गुरव, सानिका पाटील, रचना पावले, निखिल कोतेकर, वेदिका खन्नुरकर, साक्षी भादुले, सौजन्य जत्राटी, सायली तुपारे आदी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. संमेलनाचे सूत्रसंचालन शीतलताई बडमंजी यांनी केले. इंद्रजित मोरे यांनी आभार मानले. याप्रसंगी वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीचे सदस्य, विद्यार्थी, शिक्षक, पालक बहुसंख्येने उपस्थित होते
. थोरामोठय़ांची चरित्रे वाचा…
डॉ. चंद्रकांत पोतदार म्हणाले, साहित्य सहजासहजी निर्माण होत नसून त्यासाठी पुस्तकांचा कानाकोपरा चाळून शब्दांचा साठा वाढविला पाहिजे. भाषा कुठलीही असो, ती शिका व संपर्क वाढवा. त्यामुळे चांगले लिखाण करता येईल, माणसाच्या वागण्याचा अतिरेक होत असून निसर्ग त्याची परतफेड करत आहे. कोरोना हेदेखील त्याचेच उदाहरण आहे. थोरामोठय़ांची चरित्रे वाचा आणि ती माणसे कशी घडली, हे समजून घेऊन स्वतःची प्रगती करा, असा सल्लादेखील त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘फडाचा संसार’ ही कविता सादर करून उसतोडणी कामगारांचा उसतोडणीचा प्रवास उलगडला.