प्रतिनिधी / ओरोस:
वेगाने वाहने चालवणाऱया वाहन चालकांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी अशा वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिले. त्या अनुषंगाने शनिवारी कणकवली शहरात धडक कारवाई करण्यात आली, अशी माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांनी दिली.
सांगवे येथे झालेल्या अपघात ठिकाणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपअधीक्षक कटेकर, निरीक्षक संजय धुमाळ, वाहतूक शाखा निरीक्षक अविनाश भोसले यांनी भेट देत पाहणी केली. या अपघातात मोटारसायकलस्वार व त्याच्या पाठीमागे बसलेला असे दोघेजण जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात मोटारसायकलच्या अतिवेगामुळेच झाला असल्याची बाब समोर आली आहे. त्या मयत झालेल्यापैकी दोघांनीही स्वतःच्या डोक्मयावर हेल्मेट परिधान केले नव्हते. शिवाय दिवसेंदिवस रस्त्यावरील अपघातातील मृत्यूचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होते किंवा नाही, याबाबतही तपासणी केली जाणार आहे, असे स्पष्ट केले.
सावंतवाडीत 372 वाहनधारकांना 87 हजारांचा दंड
जिल्हा वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहन चालकांवर यापूर्वीही कारवाई करण्यात आली आहे. नुकत्याच सावंतवाडी येथे राबविण्यात आलेल्या मोहिमेत तब्बल 372 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 87 हजार रुपयांचा दंड अवघ्या चार दिवसांच्या कारवाईतून गोळा करण्यात आला असल्याचेही भोसले यांनी स्पष्ट केले.
वर्षभरात 122 वाहन चालकांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित
दरम्यान, मागील वर्षभरात जिल्हय़ाच्या विविध भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईत जानेवारीपासून आतापर्यंत 176 वाहनधारकांचे वाहन चालविण्याचे परवाने रद्द करण्याबाबतची प्रस्ताव उपफ प्रादेशिक परिवहन कार्यलयाकडे पाठविण्यात आले. यापैकी 122 परवाने 3 महिने कालावधसाठी रद्द करण्याची कारवाई आरटीओकडून करण्यात आली. तसेच नोव्हेंबर महिन्यात आळाखी 59 वाहन चालकांचे परवाने रद्द करण्यासाठीचे प्रस्तावही सादर करण्यात आले असून त्यावरही निलंबन कारवाई अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.
वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन
अधीक्षकांच्या आदेशानुसार महामार्ग वाहतूक पोलिसांकडूनही महामार्गावर वाहतूक नियमांचे पालन होते किंवा नाही, याची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी दक्ष राहून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कारवाईपासून बचाव करावा, असे आवाहनही अविनाश भासले यांनी केले आहे.