ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
वाहनांचा विमा काढण्यासाठी आता पीयूसी (प्रदूषण नियंत्रण चाचणी) प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे. आयआरडीएने विमा कंपन्यांसाठी यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.
सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच विमा कंपन्या आणि ग्राहकांना आदेश दिले होते की, वाहनाचे प्रदूषण नियंत्रण चाचणी प्रमाणपत्र असल्याशिवाय वाहन विम्याचे नूतनीकरण करू नये. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, असे आयआरडीएने म्हटले आहे. त्यामुळे विम्याच्या नुतनीकरणासाठी वाहन मालकाकडे पीयूसी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारने वाहनांना पीयूसी बंधनकारक केली आहे. त्यानुसार प्रत्येक वाहनधारकांने आपल्या वाहनाची प्रमाणित मानांकानुसार तपासणी करून घेणे आवश्यक आहे.