वृत्तसंस्था/ साऊदम्पटन
विंडीज संघाबरोबर होणाऱया भारताच्या आगामी पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि यष्टीरक्षक रिषभ पंत त्याचप्रमाणे अन्य काही वरि÷ खेळाडू खेळण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. अलीकडेच झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत शर्मा, कोहली आणि पंत यांना विश्रांती देण्यात आली होती.
भारतीय क्रिकेट संघ 22 जुलै रोजी विंडीजच्या दौऱयावर रवाना होईल. या दौऱयामध्ये 3 सामन्यांची वन डे मालिका आणि 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱयावर असून उभय संघात टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 17 जुलैला होणार आहे. आयसीसीच्या आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पूर्वतयारी करण्याकरता बीसीसीआयने विंडीज दौऱयासाठी ज्ये÷ खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि पंत यांचा भारतीय संघात समावेश करण्याची शक्मयता वर्तविली आहे. माजी कर्णधार विराट कोहली फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी सध्या झगडत आहे. मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेत तो खेळू शकला नव्हता. तसेच इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन येथे झालेल्या पाचव्या कसोटीत कोहलीने केवळ 31 धावा जमविल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा याला कोरोनाची बाधा झाल्याने त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत खेळता आले नव्हते. पण गुरुवारी त्याने टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते. टी-20 प्रकारात भारतीय संघाला सलग तेरा विजय मिळवून देणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय कर्णधार आहे. विंडीजच्या दौऱयात होणाऱया वन डे मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपविण्यात आले असून रविंद्र जडेजा उपकर्णधार राहील.
भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभम गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन, संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्षदीप सिंग.