नितीन गडकरी यांचे निवेदन : भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
प्रतिनिधी /पणजी
गोव्याच्या विकासाची घोडदौड सुरु ठेवण्यासाठी गोव्याला पुन्हा एकदा विकासभिमुख डबल इंजीनच्या स्थिर सरकारची गरज आहे. केंद्रात आणि गोव्यात भाजप सरकार असल्याने डबल इंजीनच्या सरकारने गोव्याचा भरभरून विकास केला आहे. दहा वर्षापूर्वीचा गोवा आणि आजचा गोवा यात अमुलाग्र बदल झालेला दिसून येत असल्याचे प्रतिपादन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
येणारी विधानसभा निवडणूक डोळ्य़ासमोर ठेऊन भाजपने पणजी येथे निवडूक प्रचार कार्यलय सुरु केले आहे. उद्घाटन सोहळ्य़ास नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री दीपक पावसकर, माविन गुदीन्हो, खासदार विनय तेंडुलकर, पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात व अन्य मान्यवर उपस्थित होते.
गडकरी पुढे म्हणाले की, आत्तापर्यंत केंद्र सरकारने गोवा सरकारला भरभरून मतद केली आहे. केवळ केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग तसेच वाहतूक खात्यातर्फे 22 हजार कोटी रुपयांहून अधिक कामे पूर्ण केली आहेत. चौपदरी महामार्ग आणि आवश्यक ठिकाणी पुलांची उभारणी केली आहे. मोपा विमानतळ, झुवारी पूल यासारखे प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहेत. झुवारी पुलावर उभारण्यात येणारी गॅलरी पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. या विकासकामांमुळे युवकांना अधिकाधिक रोगजार निर्माण होणार आहे. एकूणच गोवा प्रगतशील आणि समृद्ध बनत चालला आहे, असेही गडकरी म्हणाले.
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकरांचे नेतृत्व गोव्याच्या विकासाची खरी ताकद होती. गोव्याच्या विकासासाठी ते सदोदित कार्यकरत होते. केंद्रातील प्रमुख मंत्रीपद सोडून ते गोव्याच्या लोकांसाठी काम करायाला गोव्यात आले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी कार्य बजावले. गोमंतकीय जनतेने त्यांना चांगली साथ दिली. या साऱयामुळे गोव्याला डबल इंजीनचे स्थिर सरकार मिळाले आणि गोव्याचा झपाटय़ाने विकास होत गेला.
केंद्रांतून पैसा मिळत असला तरी कामांची अमंलबजवणी करण्याचे काम स्थानिक सरकानेच करायला हवे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांचे मंत्री योग्य तऱहेने जबाबदरी पार पाडत आहे असे आपण विश्वासपूर्वक सांगू शकतो, असेही गडकरी म्हणाले.
निवडणुका जवळ आल्या तशा अनेक राजकीय पक्ष गोव्यात आपले नशीब आजमविण्यासाठी येत आहे. पावसाळ्य़ात बेडके डोके वर काढतात तशी स्थिती या राजकीय पक्षांची आहे. मात्र गोव्यातील जनता समजूतदार आहे, असेही गडकरी म्हणाले.
गोव्याचा विकास कसा करावा ते अर्ध्या राज्याच्या अर्ध्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगताना दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले. ज्या मुख्यमंत्र्यावर त्याच्याच भागातील एक रिक्षाचालक भर रस्त्यात कानफाटीत मारतो त्या मुख्यमंत्र्याची काय लायकी आहे ते सांगायची गरज नाही. त्यामुळे केजरीवाल यांनी बेजबाबदरपणाचे वक्तव्य करू नये. येत्या निवडणुकीत केजरीवालची काय जागा आहे ते गोमंतकीय जनता दाखवून देईल. निवडणुका झाल्या की केजरीवालला गाशा गुंडाळावा लागणार, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत म्हणाले. यावेळी खासदार विनय तेंडुलकर, सदानंद तानावडे यांनीही समयोचित विचार मांडताना भजपा स्वबळावर निवडणुकीला समोरे जाऊन 22 पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.
माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी मान्यवरांचे स्वगत केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलीत करून प्रचार कार्यालयाचे रितसर उद्घाटन कराण्यात आले. शेवटी सावईकर यांनीच उपस्थिताचे आभार मानले.