विजयी होण्यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न: मतदारांनी गावचा विकास करणाऱया-प्रामाणिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची नितांत गरज
आण्णाप्पा पाटील / बहाद्दरवाडी
येत्या 22 रोजी होणाऱया ग्रामपंचायत निवडणुकीची तालुक्मयात रणधुमाळी सुरू झाली आहे. सोमवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर रिंगणातील उमेदवारांना प्रचारासाठी चिन्ह मिळाले असून उमेदवारांकडून गावागावांमध्ये जोरदार प्रचार सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी त्या-त्या गावातील ग्रामपंचायत सदस्य हे विकासाला प्राधान्य देणारे व प्रामाणिक कार्यकर्ते असले पाहिजेत आणि मतदारांनी निवडणुकीच्या काळात अशा उमेदवारांनाच आपली मते देऊन संधी देण्याची गरज आहे.
ग्रामपंचायतीमार्फत विविध प्रकारच्या योजना राबविल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळेच गेल्या दहा वर्षांपासून तालुक्मयात ग्रामपंचायत निवडणूक ही अत्यंत चुरशीची होऊ लागली आहे.
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काही माजी सदस्यांसह तरुणांनी देखील सक्रियपणे सहभाग घेतला आहे. ग्रामपंचायतीमध्ये विजयी होण्यासाठी उमेदवारांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समिती,
भाजप, काँग्रेस आदी पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. मात्र गाव पातळीवर राजकारण असल्यामुळे अनेक उमेदवार ग्राम विकास आघाडी किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. तसेच काही उमेदवार पॅनेलद्वारे निवडणूक लढवत आहेत.
मतदारांच्या गाठीभेटीवर भर
प्रचाराचा नारळ उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी फोडला असून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात येत आहेत. तुमची सर्व प्रकारची कामे करून देऊ तसेच गावातील रस्ते गटारी आधी समस्याही सोडवू असे प्रत्येक उमेदवारांकडून आश्वासन देण्यात येऊ लागले आहे. मतदानासाठी आश्वासन देणारा उमेदवार खरोखरच भविष्यात ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर या सुविधा पुरवण्यासाठी काम करील का ? याचे चिंतन ही मतदारांनी करायला
हवे.
छपाईवाल्यांना मिळाला व्यवसाय
सोमवारी अर्ज माघारी झाल्यानंतर चिन्हाचे वाटप करण्यात आले. यानंतर प्रचारासाठी लागणाऱया परिपत्रिकांची छपाई करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली होती. बेळगाव शहरात एकदमच ग्रामपंचायत उमेदवारांनी निवडणूक छपाईचे काम मुद्रण धारकांना दिल्यामुळे अनेक ठिकाणच्या छपाईप्रेसमध्ये गर्दी दिसून आली. कोरोना सुरू झाल्यापासून छपाई धारकांचा व्यवसायही ठप्प झाला होता. ग्राम पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून छपाईवाल्यांनाही व्यवसाय मिळाला आहे.
ग्रामपंचायत सदस्यांची भूमिका महत्त्वाची
ग्रामपंचायतीच्या कारभारावर त्या भागाचा विकास अवलंबून आहे. कार्यसक्षम ग्रामपंचायत सदस्य असल्यास नक्कीच हा भाग सुधारेल. प्रशासनामार्फत ग्रामपंचायतीसाठी विविध योजना राबविण्यात जातात, त्याचा खऱया लाभार्थ्यांना उपयोग होणे आवश्यक आहे. या भागाचा कायापालट करण्यासाठी व विविध योजना राबविण्यासाठी मुख्य भूमिका असते ती ग्रामपंचायत सदस्यांची आणि या सदस्यांची निवड करणे आता मतदारांच्या हाती आहे.
अनेक गावांमध्ये रस्त्यांची समस्या गंभीर
सध्या तालुक्मयाच्या बऱयाच भागात तसेच गावातील अंतर्गत रस्त्यांची समस्या गंभीर बनली आहे. खड्डे आणि धूळ मातीचा सामना वाहनधारकांना करावा लागतो आहे. काही भागात पावसाळय़ातही पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवते. पाणीसाठा आहे मात्र योग्य नियोजनाअभावी पाण्यापासून वंचित राहावे लागते.
पथदीप- कचऱयाची समस्या
काही भागात गावांमधील पथदीप बंद असल्यामुळे अंधाराचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. याशिवाय कचऱयाचे ढीग आणि त्यातून पसरणारी दुर्गंधी, तुंबलेल्या गटारी आदी समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
नागरिकांना या सर्व समस्येतून बाहेर काढण्यासाठी व त्यांना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यसक्षम ग्रामपंचायत सदस्याची गरज आहे. सध्या निवडणूक रिंगणात अनेक जण उभे आहेत. आपल्याला नागरी सुविधा पुरविण्यासाठी कोणता उमेदवार कार्यसक्षम आहे. याचा मतदारांनी जरूर विचार करायला हवा.
शैक्षणिक दर्जा सुधारण्याची गरज
काही गावांमध्ये शाळांच्या जुन्या इमारती आहेत. तसेच हायस्कूल, शाळांसाठी मैदाने नाहीत. यामुळे विद्यार्थी वर्गाची ही गैरसोय होत आहे. गावांमधील शैक्षणिक दर्जाही सुधारण्याची गरज आहे.